शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अभयारण्यात वर्षा सहलीचा आनंद लुटताना निसर्गाची हानी टाळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

नाशिकपासून अवघ्या ७०किलोमीटरवरील भंडारदरा परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भटकंतीसाठी हजेरी लावतात. अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी गावांना याद्वारे ...

नाशिकपासून अवघ्या ७०किलोमीटरवरील भंडारदरा परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भटकंतीसाठी हजेरी लावतात. अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी गावांना याद्वारे रोजगारही मिळतो. गावकरी आणि वन-वन्यजीव विभाग एकमेकांच्या हातात हात घालून शाश्वत विकासाच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्याच्या संरक्षणाकरिता व वन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून पर्यटकांचे प्रमाण घसरले आहे.

यावर्षी पावसाने जरी ओढ दिली असली तरी आतापर्यंत झालेल्या थोड्याफार पावसाने अभयारण्याचे सौंदर्य बहरू लागले आहे. वन्यजीव विभागाने येथील तपासणी नाके अधिकाधिक सक्षम केले आहेत. वनरक्षकांसह ग्राम परिस्थिकीय विकास समितीच्या माध्यमातून तरुणांची येथे नेमणूक करून त्यांना रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे. तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तपासणी करून पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. पर्यटकांनी वन तपासणी नाक्यावर सहकार्य करणे आवश्यक आहे.

या अभयारण्याची भंडारदरा आणि राजुर ही दोन वनपरिक्षेत्रे आहेत. या दोन्ही वनपरिक्षेत्रांकरिता वन्यजीव विभागाचे स्वतंत्र चमू वनक्षेत्रपालांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत. वन्यजीव कर्मचाऱ्यांकडे वॉकीटॉकी तसेच वाहनांना पीए सिस्टिम यंत्रणा बसविण्यात आली आहे.

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर शेकरू या राज्यप्राण्याच्या अधिवासाकरिताही नावारूपाला येत आहे. धबधब्यांसह अन्य प्रेक्षणीय स्थळांसह पांजरे बेटदेखील विकसित केले जात आहे. न्हानी वॉटरफॉल अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. या धबधब्याच्या ठिकाणी यापूर्वी मातीची एकच पाऊलवाट होती. वन्यजीव विभागाने दोन वाटा तयार करून सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. तसेच संरक्षक लोखंडी रेलिंगदेखील लावली आहे. ठिकठिकाणी प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आली आहे. अभयारण्यात जागोजागी लावलेल्या सूचना फलकांवरील सूचनांचे पालन प्रत्येकाने काटेकोरपणे केल्यास निसर्गाची हानी टळेल आणि स्वत:चीही सुरक्षितता धोक्यात सापडणार नाही, एवढेच यानिमित्ताने सांगू इच्छितो...!

- गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

110721\11nsk_7_11072021_13.jpg

गणेश रणदिवे, सहा.वनसंरक्षक नाशिक वन्यजीव