शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
3
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
4
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
5
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
6
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
7
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
8
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
9
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
10
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
11
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
12
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
13
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
14
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
15
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
16
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
17
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
18
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
19
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
20
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

अभयारण्यात वर्षा सहलीचा आनंद लुटताना निसर्गाची हानी टाळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

नाशिकपासून अवघ्या ७०किलोमीटरवरील भंडारदरा परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भटकंतीसाठी हजेरी लावतात. अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी गावांना याद्वारे ...

नाशिकपासून अवघ्या ७०किलोमीटरवरील भंडारदरा परिसरात पसरलेल्या या अभयारण्यात दरवर्षी हजारो पर्यटक भटकंतीसाठी हजेरी लावतात. अभयारण्य क्षेत्रातील आदिवासी गावांना याद्वारे रोजगारही मिळतो. गावकरी आणि वन-वन्यजीव विभाग एकमेकांच्या हातात हात घालून शाश्वत विकासाच्या दिशेने आपली वाटचाल गतिमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. नाशिक वन्यजीव विभागाकडून अभयारण्याच्या संरक्षणाकरिता व वन पर्यटनाला चालना मिळावी यासाठी विविध उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कोरोनामुळे दोन वर्षांपासून पर्यटकांचे प्रमाण घसरले आहे.

यावर्षी पावसाने जरी ओढ दिली असली तरी आतापर्यंत झालेल्या थोड्याफार पावसाने अभयारण्याचे सौंदर्य बहरू लागले आहे. वन्यजीव विभागाने येथील तपासणी नाके अधिकाधिक सक्षम केले आहेत. वनरक्षकांसह ग्राम परिस्थिकीय विकास समितीच्या माध्यमातून तरुणांची येथे नेमणूक करून त्यांना रोजगाराची संधी निर्माण करून दिली आहे. तपासणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तपासणी करून पर्यटकांना प्रवेश दिला जात आहे. पर्यटकांनी वन तपासणी नाक्यावर सहकार्य करणे आवश्यक आहे.

या अभयारण्याची भंडारदरा आणि राजुर ही दोन वनपरिक्षेत्रे आहेत. या दोन्ही वनपरिक्षेत्रांकरिता वन्यजीव विभागाचे स्वतंत्र चमू वनक्षेत्रपालांच्या नियंत्रणाखाली कार्यरत आहेत. वन्यजीव कर्मचाऱ्यांकडे वॉकीटॉकी तसेच वाहनांना पीए सिस्टिम यंत्रणा बसविण्यात आली आहे.

कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा परिसर शेकरू या राज्यप्राण्याच्या अधिवासाकरिताही नावारूपाला येत आहे. धबधब्यांसह अन्य प्रेक्षणीय स्थळांसह पांजरे बेटदेखील विकसित केले जात आहे. न्हानी वॉटरफॉल अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. या धबधब्याच्या ठिकाणी यापूर्वी मातीची एकच पाऊलवाट होती. वन्यजीव विभागाने दोन वाटा तयार करून सिमेंटच्या पायऱ्या बांधल्या आहेत. तसेच संरक्षक लोखंडी रेलिंगदेखील लावली आहे. ठिकठिकाणी प्रसाधनगृहांची उभारणी करण्यात आली आहे. अभयारण्यात जागोजागी लावलेल्या सूचना फलकांवरील सूचनांचे पालन प्रत्येकाने काटेकोरपणे केल्यास निसर्गाची हानी टळेल आणि स्वत:चीही सुरक्षितता धोक्यात सापडणार नाही, एवढेच यानिमित्ताने सांगू इच्छितो...!

- गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक, कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य

110721\11nsk_7_11072021_13.jpg

गणेश रणदिवे, सहा.वनसंरक्षक नाशिक वन्यजीव