शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

सरासरी ५0 टक्के मतदान

By admin | Updated: August 29, 2016 01:39 IST

पोटनिवडणूक : मतदानासाठी लागल्या रांगा; सायंकाळी पाचनंतरही मतदारांचा ओघ

 नाशिक : जेलरोड प्रभाग ३५ व ३६ च्या पोटनिवडणुकीत रविवारी दिवसभर कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले. प्रभाग ३५ मध्ये ४७.७० तर प्रभाग ३६ मध्ये ५३.६२ टक्के इतके मतदान झाले. सोमवारी सकाळी १० वाजता मतमोजणी होणार आहे. जेलरोड येथील प्रभाग ३५ ब व ३६ ब च्या पोटनिवडणुकीमध्ये रविवारी सकाळी ७.३० वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. गेल्या दोन दिवसांपासून निवडणुकीच्या मुद्द्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली असता सर्वांचे लक्ष मतदान प्रक्रियेकडे लागले होते. मात्र, मतदारांनी मतदानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रभाग ३६ मधील नेहरूनगर मनपा शाळा या मतदान केंद्रावरतर सकाळी मतदान सुरू होण्यापूर्वीच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर दोन्ही प्रभागाच्या मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून बुथ उभारण्यात आले होते. या बुथवरही सकाळपासूनच गर्दी दिसून आली. पोटनिवडणूक चारही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाल्याने या निवडणुकीसाठी प्रचंड चूरस निर्माण झाली आहे. त्यामुळे चारही पक्षांच्या प्रमुख उमेदवारांकडून मतदानासाठीदेखील जोरदार नियोजन करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे सकाळपासून सर्वच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी १ वाजेपर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. शिवसेना, भाजपा, मनसे, राष्ट्रवादी, कॉँग्रेस आदि पक्षांचे लोकप्रतिनिधी, जिल्हाप्रमुख, शहराध्यक्ष त्याचप्रमाणे नगरसेवक प्रभागांमध्ये तळ ठोकून होते. मतदान केंद्रांपर्यंत मतदारांना आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात होते. सकाळपासून सुरू झालेला मतदारांचा ओघ दुपारी १ वाजेनंतर काहीसा मावळला. त्यानंतर मात्र ४ वाजेनंतर पुन्हा मतदान केंद्रावर गर्दी झाली. प्रभाग ३५ करिता जेलरोड पाण्याची टाकी येथील सानेगुरुजी मनपा शाळेत १ ते ७ खोल्या तर बाल येशू सेवादन शाळेत ३ खोल्या असे एकूण १० खोल्यांमध्ये मतदान कक्ष उभारण्यात आले होते. सर्वाधिक मतदार मनपा शाळेत असल्याने याठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. प्रभाग ३६ साठी जेलरोड, के. एन. केला शाळा, भीमनगर मनपा व्यायाम शाळेत नेहरूनगर मनपा शाळेमध्ये मतदान कक्ष होते. जेलरोड, कॅनॉलरोड झोपडपट्टीतील सर्व मतदान नेहरूनगर मनपा शाळेत असल्याने याठिकाणी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान सुरू होते. राजकीय पक्षांसाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची ठरल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रभागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रांजवळ मतदारांव्यतिरिक्त कुणालाही फिरकू दिले जात नव्हते. त्यातच पैसे वाटप होत असल्याच्या अनेकदा अफवा पसरल्याने पोलीस यंत्रणेची धावपळ झाली. सायंकाळपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असलीतरी कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. (प्रतिनिधी)