शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांनी भिंतीपलीकडचे जग पाहावे

By admin | Updated: October 3, 2015 23:23 IST

विश्वास पाटील : देशमुख यांच्या ‘झेरॉक्स’, ‘सिंगल’ पुस्तकांचे प्रकाशन

नाशिक : लेखकांनी नेहमी भिंतीपलीकडचे जग पाहायला हवे, कुंपणापलीकडे धाव घ्यायला हवी. जे लेखक डोळसपणे समाजात वावरतात, त्यांचे लेखन अनुभवातून येते. त्यामुळे ते सच्चे असते, असे प्रतिपादन प्रख्यात लेखक विश्वास पाटील यांनी केले. मानसी देशमुख लिखित आयकॉन प्रकाशनाच्या ‘झेरॉक्स’ या कथासंग्रहाचे व ‘सृजन संवाद’ या ललित लेखसंग्रहाचे प्रकाशन कुसुमाग्रज स्मारकात आज झाले, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून पाटील बोलत होते. ज्येष्ठ लेखक ह. मो. मराठे, साहित्यिक सुमेध रिसबूड (वडावाला), डॉ. जयंत वाघ, ‘लोकमत’च्या ठाणे व पालघर आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुमार टेणी, आयकॉन पब्लिकेशन्सचे मनोज वरंदळ व्यासपीठावर उपस्थित होते. पाटील म्हणाले, नव्या लेखकांच्या साहित्यातून बऱ्याचदा हाती फारसे काही लागत नाही; मात्र देशमुख यांची कथा ताकदीची आहे. मेघना पेठे यांनी जशी नव्या अनुभवांची, नव्या स्त्रीची कथा मराठी साहित्यात आणली, त्या दिशेनेच देशमुख यांनी पुढचे पाऊल टाकले आहे. लेखनात सच्च्या अनुभवाबरोबरच सच्ची भाषा येते, तेव्हा त्यात काही अश्लील वाटत नाही. कलावंतांनी कौतुक करणाऱ्या माणसांच्या घोळक्यात राहण्याऐवजी आहे त्यापेक्षा अधिक चांगले कसे करता येईल, याचा प्रयत्न करीत राहावा. आपली ‘पांगिरा’ कादंबरी प्रचंड गाजली; मात्र त्यामागचे रहस्य वेगळेच आहे. दिनकर गांगल व अरुण साधू यांनी या कादंबरीचे हस्तलिखित वाचून त्यात काही दुरुस्त्या सुचवल्या. त्यामुळे ही कादंबरी आपण नव्याने लिहिली व त्यानंतर ती यशस्वी झाली. लेखकाने नेहमी श्रेष्ठ साहित्य घडवण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. कार्यक्रमात सुमेध वडावाला (रिसबूड) यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मानसी देशमुख यांची प्रगट मुलाखत घेण्यात आली. नंदकुमार टेणी यांनी सूत्रसंचालन केले.