शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावे

By admin | Updated: May 7, 2017 01:38 IST

टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना नाहीत. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढत असून, जिथे पाणीटंचाईची तीव्रता अधिक असेल, तेथे तत्काळ टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, यतिन पगार, सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. भारती पवार, भास्कर गावित, बाळासाहेब क्षीरसागर, सविता पवार, किरण थोरे, यतिन कदम, शंकर धनवटे आदि उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच अनिल लांडगे यांनी गाळयुक्त शिवार व गावयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील किमान १०० गावातून पाझरतलाव व कोटा बंधाऱ्यातून लोकसहभागातून गाळ काढण्यात येणार आहे. गाळ काढण्यासाठी जेसीबी आणि इंधन जिल्हाधिकारी कार्यालय उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेमके किती तासांचे इंधन मिळणार आहे आणि किती गाळ काढायचा आहे, याची माहिती डॉ. आत्माराम कुंभार्डे, भास्कर गावित यांनी विचारली. तसेच डोंगराळ भागात ही योजना राबविणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. मात्र संबंधित गाळ वाहून नेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहणार असल्याचा खुलासा कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले यांनी केला. जलयुक्तचा एक कोटींचा निधी परस्पर वळविल्याचा आरोप डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बैठकीला नसल्याने डॉ. आत्माराम कुंभार्डे व डॉ. भारती पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या विभागाची आठ दिवसांत स्वतंत्र बैठक बोलविण्याची मागणी यतिन कदम व भास्कर गावित यांनी केली. मिलिंद शंभरकर यांनी बैठकीस अनुपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा बजावून त्याची प्रत वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सविता पवार यांनी येवला तालुक्यात ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी चाळीस हजाराची मागणी केली जात असल्याचा आरोप केला. जिल्ह्णात टंचाईची तीव्रता वाढत असून, पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यास पंधरा पंधरा दिवस लागत असल्याने तहसीलदारांनाच टॅँकर मंजुरीचे अधिकार देण्याचा ठराव मांडला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.बैठकीत यतिन कदम यांनी १९ जानेवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील निफाड तालुक्यातील एका रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश एका पत्रान्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत, त्याचे काय झाले? अशी विचारणा उपअभियंता व्ही. एन. पाटील यांच्याकडे केली. तसे पत्रच आले नसल्याचा दावा व्ही. एन. पाटील यांनी करताच संतापलेल्या डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राचा असा अनादर होत असेल तर आम्हाला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, पत्र शोधून त्यानुसार त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी असे पत्र आले आहे, त्यानुसार तत्काळ चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.