शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावे

By admin | Updated: May 7, 2017 01:38 IST

टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात पाणीटंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना नाहीत. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता वाढत असून, जिथे पाणीटंचाईची तीव्रता अधिक असेल, तेथे तत्काळ टॅँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, असा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला.अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सभापती मनीषा पवार, यतिन पगार, सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, सदस्य डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. भारती पवार, भास्कर गावित, बाळासाहेब क्षीरसागर, सविता पवार, किरण थोरे, यतिन कदम, शंकर धनवटे आदि उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच अनिल लांडगे यांनी गाळयुक्त शिवार व गावयुक्त शिवार अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील किमान १०० गावातून पाझरतलाव व कोटा बंधाऱ्यातून लोकसहभागातून गाळ काढण्यात येणार आहे. गाळ काढण्यासाठी जेसीबी आणि इंधन जिल्हाधिकारी कार्यालय उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेमके किती तासांचे इंधन मिळणार आहे आणि किती गाळ काढायचा आहे, याची माहिती डॉ. आत्माराम कुंभार्डे, भास्कर गावित यांनी विचारली. तसेच डोंगराळ भागात ही योजना राबविणे शक्य होणार नसल्याचे सांगितले. मात्र संबंधित गाळ वाहून नेण्याची जबाबदारी शेतकऱ्यांची राहणार असल्याचा खुलासा कार्यकारी अभियंता बापूसाहेब देसले यांनी केला. जलयुक्तचा एक कोटींचा निधी परस्पर वळविल्याचा आरोप डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी केला. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता बैठकीला नसल्याने डॉ. आत्माराम कुंभार्डे व डॉ. भारती पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या विभागाची आठ दिवसांत स्वतंत्र बैठक बोलविण्याची मागणी यतिन कदम व भास्कर गावित यांनी केली. मिलिंद शंभरकर यांनी बैठकीस अनुपस्थित असलेल्या कार्यकारी अभियंत्यांना नोटिसा बजावून त्याची प्रत वीज वितरण कंपनीच्या मुख्य अभियंत्यांना सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. सविता पवार यांनी येवला तालुक्यात ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी चाळीस हजाराची मागणी केली जात असल्याचा आरोप केला. जिल्ह्णात टंचाईची तीव्रता वाढत असून, पिण्याच्या पाण्याचे टॅँकर सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यास पंधरा पंधरा दिवस लागत असल्याने तहसीलदारांनाच टॅँकर मंजुरीचे अधिकार देण्याचा ठराव मांडला, तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला.बैठकीत यतिन कदम यांनी १९ जानेवारी २०१७ मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील निफाड तालुक्यातील एका रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश एका पत्रान्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेत, त्याचे काय झाले? अशी विचारणा उपअभियंता व्ही. एन. पाटील यांच्याकडे केली. तसे पत्रच आले नसल्याचा दावा व्ही. एन. पाटील यांनी करताच संतापलेल्या डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राचा असा अनादर होत असेल तर आम्हाला सभागृहात बसण्याचा अधिकार नाही, पत्र शोधून त्यानुसार त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी असे पत्र आले आहे, त्यानुसार तत्काळ चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.