शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

जिल्ह्यातील शेतमालाचे लिलाव आजपासून बंद

By admin | Updated: June 16, 2014 01:05 IST

व्यवहार थंडावणार : ‘लेव्ही’चा मुद्दा पेटला

 

लासलगाव : ‘लेव्ही’च्या मुद्यावरून सोमवारपासून (दि.१६) नाशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांतील शेतीमालांच्या लिलाव प्रक्रियेत सहभाग न घेण्याचा निर्णय माथाडी कामगार व व्यापाऱ्यांनी घेतला असून, त्यामुळे बाजार समित्यांमधील व्यवहार थंडावणार आहेत. सध्या ३४ टक्के ‘लेव्ही’ वसूल केली जाते. त्यात दहा टक्के वाढ करून ती ४४ टक्के करावी अशी माथाडी कामगारांची मागणी असून, त्यास व्यापाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. जुुने दर लागू ठेवले तरच लिलावात सहभागी होणार असल्याची भूमिका व्यापारी वर्गाने घेतली आहे तर नव्या दरानेच काम करणार असल्याची भूमिका माथाडी संघटनेच्या नेत्यांनी घेतली आहे. तोलाईचा दोन रुपये बारा पैसे असा जुना दर होता तो जिल्हा उपनिबंधकांच्या मान्यतेनुसार तीन रुपये पाच पैसे करण्यात आला आहे, तर हमालीकरिता असलेला दोन रुपये अडुसष्ट पैसे त्यात बदल करून तो दर तीन रुपये शहाऐंशी पैसे असा करण्यात आला आहे.काही महिन्यांपूर्र्वी जिल्हा उपनिबंधक सुनील बनसोडे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील पंधरा बाजार समिती कार्यालयांनी हमाली व तोलाई दरात वाढ केलेली आहे. यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शेतकऱ्यांकडून लेव्हीची रक्कम वसूल करू नये असे आदेश दिलेले आहेत. त्यानंतर आता माथाडी कामगार बाजार समितीचे नोकर की व्यापाऱ्यांचे या मुद्यावरून निफाडच्या दिवाणी न्यायालयात दावा प्रविष्ट आहे, असे असताना शेतीमालाचे लिलाव बंद करण्यात आल्यामुळे संभ्रम निर्माण झाला असून, या प्रकारामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. (वार्ताहर)