शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

येवला बाजार समितीत अमावास्येलाही शेतमालाचे लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून बाजार समितीतील सर्व परवानेधारक खरेदीदार, व्यापारी यांची बैठक शुक्रवारी (दि. ९) मुख्य प्रशासक, ...

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून बाजार समितीतील सर्व परवानेधारक खरेदीदार, व्यापारी यांची बैठक शुक्रवारी (दि. ९) मुख्य प्रशासक, सचिव व प्रशासक सदस्य यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. येवला बाजार समितीची स्थापना १२ मार्च १९५५ रोजी झाली असून प्रत्यक्ष कामकाज १५ सप्टेंबर १९५७ रोजी सुरू झालेले आहे. तेव्हापासून आजपर्यंत दर अमावास्येला येवला बाजार समितीत कांदा, मका व भुसार मालासह धान्याचे लिलाव बंद राहत होते. परंतु शेतकरी बांधवांची कांदा विक्रीची निकड विचारात घेऊन व शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून येवला बाजार समितीने मागील ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढून यापुढे प्रत्येक अमावास्येला इतर बाजार समित्यांप्रमाणे शेतमाल लिलाव चालू ठेवण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेतला आहे. बैठकीस मुख्य प्रशासक वसंत पवार, प्रशासक सदस्य भानुदास जाधव, सचिव के.आर. व्यापारे, व्यापारी नंदकिशोर आट्टल, सुमित समदडीया, जयेश ठाकूर, योगेश सोनी, प्रणव समदडिया, शंकरशेठ कदम, अर्शद शेख आदी उपस्थित होते.

इन्फो

कांदा विक्री वाढणार

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दिवस लिलावाचे कामकाज व्हावे याकरिता प्रयत्न करण्यात येत असून अमावास्येच्या दिवशी लिलाव चालू राहणार असल्याने वर्षात बारा दिवस वाढीव होणार आहेत. त्यामुळे २ ते ३ लाख क्विंटल कांदा विक्री वाढणार असल्याचे पवार यांनी सांगितले.