शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

जिल्ह्यातील धोकेदायक ठिकाणांवर लक्ष

By admin | Updated: August 2, 2014 01:23 IST

सीमेवरील धरणाची गळती : गुजरात राज्याशी संपर्क

नाशिक : माळीण येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्णातील धोकेदायक ठिकाणांची माहिती गोळा करून ज्या ठिकाणी दरडी कोसळू शकतील अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर सापुतारालगत असलेल्या धरणातून गळती सुरू झाल्यामुळे नजीकच्या गावांना निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत गुजरात सरकारशी संपर्क साधण्यात आला आहे. जिल्ह्णातील पेठ, सुरगाणा, इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या भागांत गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार पाऊस होत असल्यामुळे काही ठिकाणी माळणीसारखी दरड वा डोंगर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मोठी दुर्घटना टाळण्यासाठी अगोदरपासूनच नागरिकांमध्ये जागृती करण्याबरोबर दुर्घटना प्रतिबंध उपाययोजना करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. ज्या गावांना अशा स्वरूपाचा धोका आहे, तेथील नागरिकांना संभाव्य धोक्याची कल्पना देण्यासाठी दवंडी पिटण्याचे ठरविण्यात आले. त्याचबरोबर धोकादायक भाग उतरून घेण्याचे व यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, कळवण तालुक्यांतील नद्या, नाल्यांच्या पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून, त्यासाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सापुतारानजीकच्या मंगलीदिगर येथे गुजरात सरकारने बांधलेल्या मध्यम धरणाला गळती लागली असून, ते धोकेदायक स्थितीत आहे. या धरणाला लागूनच खालच्या बाजूला तलाव आहे. सध्या हा तलाव पाण्याने पूर्ण भरला असून, जर गुजरातचे धरण फुटले तर मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात सरकारशी व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही यासंदर्भात पाठपुरावा करण्याच्या सूचना दिल्या.