शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरीत वाढ

By admin | Updated: December 29, 2015 23:05 IST

नाशिकरोड पोलीस ठाणे : पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढता ताण

नाशिकरोड :गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, बलात्कार, सोनसाखळी चोरी, गंभीर अपघात या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. सिंहस्थ पर्वणीच्या बंदोबस्ताची जबाबदारी नाशिकरोड पोलिसांनी पार पाडली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४ खेडी समाविष्ट असून, भौगोलिकदृष्ट्या मोठी हद्द असली तरी त्या मानाने लोकसंख्या कमी आहे. मात्र विभागीय आयुक्त कार्यालयासह अनेक महत्त्वाची कार्यालय, कारखाने नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने आंदोलन, मोर्चा, उपोषण यांचा बंदोबस्त व नियोजन हे पोलीस ठाण्याच्या पाचवीलाच पुजले आहे.वर्षभरात गंभीर अपघाताच्या ४९ घटना घडल्या असून, त्यामध्ये नाशिक-पुणे महामार्गाचे रुंदीकरणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे, तर सोनसाखळी चोरीच्या ११ व इतर २ जबरी चोरीच्या घटना घडल्या आहेत.हुंड्यासाठी छळवणुकीच्या गुन्ह्यात एका गुन्ह्याने वाढ झाली आहे, तर अपघातात (फेटल) प्राण गमविणाऱ्यांचे प्रमाणदेखील घटले असून, ३५ वरून २७ वर आले आहे. नवनवीन रस्ते, रस्ता दुभाजक, पथदीप, धोक्याचे-सूचनांचे फलक, रिफ्लेक्टर, पोलीस बॅरिकेटस् यामुळे वाहनधारक वेळीच सावधान होत असल्याने अपघाताला आळा बसत आहे. मात्र बेशिस्त वाहनचालक व वाहतूक पोलिसांची पोलीस म्हणून ‘छाप’ पडत नसल्याने वाहतुकीची कोंडी व मनाला लागेल तशी वाहने उभी करत असल्याने हमरस्त्यावर व चौकाचौकात वाहतूक जाम होते. गेल्यावर्षी इतक्याच खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत, तर घरफोडीच्या गुन्ह्यातदेखील घट झाली असून, १९ गुन्हे कागदोपत्री दाखल आहेत. नाशिकरोड पोलिसांनी घरफोडी, दुचाकी चोरी, मोबाइल चोरी, सोनसाखळी चोरी, मंदिरातील चोरी असे अनेक गुन्हे उघडकीस आणून वाहने, रोकड, सोने जप्त केले आहेत. ग्रामीण खेड्यांची हद्द मोठी असल्याने त्या भागातील किरकोळ वादविवाद, मारामाऱ्या, अपघात, पाण्याची मोटार, जनावरे चोरी असे अत्यंत कमी प्रमाणात गुन्हे दाखल झाले आहेत. टवाळखोरी, छेडछाड, दुचाकीधारक युवकांची राईडिंग हे प्रकार मात्र गल्लोगल्ली वाढले आहेत. तर नाशिकरोड रेल्वे-बसस्थानक परिसरात रात्री नेहमीच वादविवाद-मारामाऱ्या, प्रवाशांना धमकावणे अशा अनेक घटना सातत्याने घडतात. बाहेरगावचे प्रवासी तक्रार देत नसल्याने ती बाब कागदावर येत नाही. वर्षभरात शेकडो मोबाइल चोरीला गेले आहेत. कायदा-सुव्यवस्थेला बाधक ठरणाऱ्या अनेक घटना पोलिसांच्या वेळीत हस्तक्षेपामुळे टळल्यादेखील आहेत.