शहरं
Join us  
Trending Stories
1
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
2
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
3
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
4
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
5
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
6
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
7
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
8
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
9
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
10
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
11
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
12
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
13
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
14
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
16
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
17
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
18
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
20
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून

घोटी बाजार समितीचा बाजार स्थलांतराचा प्रयत्न

By admin | Updated: May 8, 2015 23:50 IST

घोटी बाजार समितीचा बाजार स्थलांतराचा प्रयत्न

घोटी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराचे नियोजित कॉँक्रीटीकरणाच्या कामाकरिता बाजार समितीच्या आवारात होणारा शेतमालाचा बाजार स्थलांतरित करण्याचा बाजार समिती प्रशासनाचा प्रयत्न शुक्रवारी संतप्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी उधळून लावला.हा प्रयत्न दुसऱ्यांदा असफल झाल्याने बाजार समितीतील कॉँक्रीटीकरणाचे काम कसे करावे, असा प्रश्न बाजार समितीला पडला आहे. मात्र नवीन जागेवर बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी यांच्यासाठी कोणत्याच सोयीसुविधा दिल्या नसल्याने तसेच ही जागा शेतकऱ्यांच्या वाहनासाठी सोयीस्कर नसल्याने या ठिकाणी शेतमालाची खरेदी-विक्र ी करण्यास शेतकरी आणि व्यापारी नाखूश आहेत. यामुळेच बाजार स्थलांतरास कडवा विरोध होत आहे.घोटी बाजार समितीच्या आवाराचे सिमेंट कॉँक्रीटीकरणांचे काम करण्यात येणार असून, या ठिकाणी तालुक्यासह लगतच्या तालुक्यातूनही मोठ्या प्रमाणात शेतमालाच्या विक्रीसाठी आवक होत असल्याने या कामाला दोन महिन्यांपासून अडथळा येत असल्याने हे काम रखडले आहे. दरम्यान १६ एप्रिलपासून या बाजाराचे सिन्नर चौफुली येथील पटांगणात स्थलांतर करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला होता. मात्र या ठिकाणी बाजार समितीने शेतकरी आणि व्यापारी यांच्या वाहनांना वाहनतळ, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विजेची सोय आदि सुविधा उपलब्ध करून न देता बाजार स्थलांतर करण्याचा घाट धरला होता. मात्र व्यापारी आणि शेतकरी यांनी स्थलांतराचा प्रयत्न उधळून लावून स्थलांतरास नकार दिल्याने पुन्हा याच ठिकाणी बाजार भरू लागला आहे. ाात्र पुन्हा आज दुसर्यांदा आज हा बाजार स्थलांतर करण्याचा प्रयत्न संतप्त शेतक-यांनी आण िव्यापार्यानी उधळून लावला.गेली पंधरा दिवसात या नवीन जागेत बाजार समतिीने शेतकरी आण िव्यापार्यासाठी कोणत्याही सोयीसुविधा दिल्या नसताना बाजार समतिी प्रशासनाने आज सकाळी बाजार समतिीच्या दोन्ही प्रवेशद्वारावर ब्यारेकेट्स आण िवाहने लावून शेतकरी आण िव्यापारी यांच्या वाहनाला आत येण्यास मज्जाव केला.मात्र हा प्रयत्न संतप्त शेतकर्यांनी उधळून लावला.व्यापार्यांनी बाजार स्थलांतरास कडवा विरोध करीत स्थलांतर केल्यास आपण या ठिकाणी शेतीमाल खरेदी करण्यासाठी येणार नसल्याचे स्पष्ट केले.तर शेतक-यांनी नियोजित जागेवर शेतकरी आण िव्यापारी यांच्या सुरिक्षतेसाठी प्रथम नियोजन करावे. या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्यावे आण ित्यानंतरच स्थलांतराबाबत विचार करावा अशी भूमिका घेतली.अखेर शेतकरी आण िव्यापार्यांच्या आक्र मक भुमिकेपुढे प्रशासनाने नमते घेत दोन्ही प्रवेश द्वारे वाहनासाठी मोकळे केले.बाजार समतिीतच सुविधा नाही तर नियोजित जागेत काय मिळणार ?इगतपुरी तालुक्यासह लगतच्या त्र्यंबकेश्वर, खोडाळा, मोखाडा, अकोले, सिन्नर, नाशिक शहापूर आदी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्र ीसाठी आणला जातो तर या ठिकाणापासून कल्याण,मुंबई चे अंतर जवळ असल्याने मोठ्या प्रमाणात येथील व्यापारी शेतीमाल खरेदीसाठी येत असतात.मात्र बाजार समतिीच्या आवाराची जागा अपुरी पडत आहे.या ठिकाणी शेतकरी आणि व्यापाऱ्याना सोयीसुविधा देण्यास बाजार समिती प्रशासन हतबल ठरलेले असताना, बाजार समिती प्रशासनाने केवळ नवीन बाजारासाठी शहराजवळील सिन्नर चौफुलीजवळील जागेची निवड केली. मात्र या ठिकाणी कोणत्याही सुविधा मात्र उपलब्ध करून दिल्या नाहीत. यामुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्यात नाराजीचा सूर असून बाजार समिती हि नवीन जागा लादण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नाराज शेतकरी व व्यापाऱ्यांनी केला.