शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:12 IST

नाशिक: औरंगाबाद शहराच्या नामांतर मुद्द्यावरून काही लोक महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मुद्द्यावर तीनही पक्षांचे प्रमुख ...

नाशिक: औरंगाबाद शहराच्या नामांतर मुद्द्यावरून काही लोक महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या मुद्द्यावर तीनही पक्षांचे प्रमुख नेते सामंजस्याने मार्ग काढतील, असे सांगून या मुद्द्यावरून सरकारमध्ये अंतर पाडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरेाप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी नाशिक जिल्ह्याची केारोना आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करण्याच्या महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या मुद्द्यावर राष्ट्रवादीचे नेत शरद पवार, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी आणि शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे हे एकत्र बसून, याबाबतीत सामंजस्याने तोडगा काढतील. काही लोक मात्र सरकारमध्ये जाणीवपूर्वक अंतर निर्माण करू पाहात आहेत. महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी किमान समान कार्यक्रमांतर्गत तीनही पक्ष एकत्र आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सध्या ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांना विचारले असता, त्यांनी सरकार येत जात असतात. सूडबुद्धीच्या भावनाने कुणी राजकारण करू नये, असे सल्ला त्यांनी यावेळी दिला. ईडी कारवाईविषयी तुम्हाला जे वाटते तेच मलाही वाटते, असे विधानही त्यांनी केले. मागील सरकारच्या काळात सुरू असलेले स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग, कोस्टर रोड, तसेच मेट्रोची कामे आ‌म्ही सुरूच ठेवल्याची आठवण त्यांनी करून दिली. विकासात राजकारण आणू नये, असेही मत त्यांनी मांडले.

चार जिल्ह्यांत व्हॅक्सिनचा ड्राय रन घेण्यात आला. फक्त नंदुरबारच्या एका गावात तांत्रिक अडचण आली. सरकार कुणाचेही असले, तरी लस काही पक्षाची नाही. शेवटी हा माणसांच्या जिवाचा प्रश्न आहे, असेही ते म्हणाले. मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागला पाहिजे, असे सांगून त्यांनी फडणवीस यांनी नियुक्त केलेली वकिलांची समिती तीच आहे. त्यात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार कमी पडते, हा आरोप चुकीचा असल्याचे ते म्हणाले. सुप्रीम कोर्टातही या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय लागावा, अशी अपेक्षा त्यांनी केली.

--इन्फो--

पार्थ उमेदवार नसल्याचा पुनरुच्चार

मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत उपमुख्यमंत्री पवार यांना विचारणा केली असता, असा कोणताही विचार किंवा चर्चा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पार्थ पवारांच्या उमेदवारीची बातमी चुकीचे असल्याचे ते म्हणाले. या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असला, तरी तीन पक्षांचे सरकार असल्याने त्यांच्याशीही चर्चा करूनच उमेदवार दिला जाईल. मात्र, तो उमेदवार पार्थ नसेल, असे म्हणत हा विषय आता थांबवा, असे ते म्हणाले.