शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

विविध रोगांचे आक्रमण : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांकडून बागा उद्ध्वस्त करण्याचा सपाटा डाळिंबाचे आगार ‘तेल्या’ने बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:22 IST

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण.

ठळक मुद्देडाळिंबाचे आगार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरशेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण..... कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा अस्मानी संकटामुळे तिहेरी कात्रीत सापडून कर्जाच्या बोजाखाली दबल्या गेलेल्या बळीराजाला नैराश्य येऊन कधीकाळी आर्थिक सुबत्ता आणलेल्या डाळिंब पिकावर कुºहाड लावल्याने डाळिंबाचे आगार आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तेल्याच्या आक्रमणामुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे बेजार झाल्याने बागलाणमधील मोसम, तांदूळवाडी, दरेगाव, आरम, करंजाडी, काटवन खोºयातून हद्दपार होत असल्याचे भयावह चित्र निदर्शनास आले आहे. बागलाण हा तसा गिरणा, मोसम, आरम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी ,दोध्याड या कधीकाळी बारमाही वाहणाºया नद्यांमुळे सुपीक तालुका. अवकाळी पाऊस आणि गारपीट ग्रहण पिछाच सोडत नसल्यामुळे शेतकºयाची अक्षरश: कमाईच बसली. लालचुटूक डाळिंबाचा आदल्या दिवशी सौदा व्हायचा आणि रात्रीतून याच पिकावर तेल्याचे आक्रमण तर कधी गारपीट अशा वारंवार येणाºया अस्मानी संकटामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत गेला.तब्बल वीस वर्षं डाळिंबाचा बोलबाला ...बागलाण तालुक्यात डाळिंब पीक लागवडीला शासकीय आकडेवारीनुसार राष्ट्रीय फळ लागवड योजनेंतर्गत १९९३ पासून खºया अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात बागलाणमधील काटवन, करंजाडी, पूर्व बागलाण व गिरणा काठ परिसरात डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात झाली. भरघोस उत्पादन आणि पैसा देणारे पीक म्हणून डाळिंब शेतकºयाच्या पसंतीस उतरले. कमी खर्चात चांगला पैसा मिळत गेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकºयाच्या घरात अक्षरश: लक्ष्मीच नांदू लागली. पैसा आल्यामुळे शेतातील छप्परच्या घराची जागा टोलेजंग बंगल्यांनी घेतली.आर्थिक सुबत्तेमुळे अनेक शेतकºयांनी माळरान विकसित करून डाळिंब पिकाची यशस्वी शेती केली. शासकीय आकडेवारीनुसार २०१४ पर्यंत तब्बल सव्वीस हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाने व्यापले गेले. भरघोस पीक घेण्याच्या नादात आणि दुकानदारांनी कोणतेही औषध विक्रीसाठी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या सल्ल्यामुळे चांगली कमाई देणाºया पिकावर तेल्यासारख्या महाभयंकर रोगाने आक्रमण केले.नैराश्यातून हल्लाबोल ...डाळिंबाचे हे आगार तेल्याचे आक्रमण, अवकाळी पाऊस, गारपीट या अस्मानी संकटाबरोबरच वारंवार सीमाबंद आणि नोटाबंदी या सुलतानी संकटामुळे बेजार झाल्याचे चित्र आहे. वारंवार बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या देशांची सीमा बंद केल्यामुळे निर्यात रोखली जाते. परिणामी डाळिंबाचा उठाव कमी होऊन बाजारभाव गडगडतात. गेल्या वर्षी नोटाबंदीच्या निर्णयामुळे हवाला पद्धतीवर त्याचा मोठा परिणाम होऊन परदेशी व्यापाºयांनी काढता पाय घेतल्यामुळे डाळिंबाचा उठाव कमी होऊन त्याचे भावावर परिणाम झाले. दरम्यान, डाळिंबाला २०१३ पासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे ग्रहण लागले आहे. यामुळे तेल्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन बागांचे बहुतांशी नुकसान झाले. सातत्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही हातात बँकेच्या कर्जाची नोटीसच मिळते. या नैराश्यातून बळीराजाने आता पिकावरच राग काढत उभ्या पिकाला कुºहाड लावून झाड उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला आहे.