शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
3
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
4
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
5
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
6
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
7
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
8
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
9
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
10
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
11
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
12
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
13
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
14
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
15
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
16
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
17
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
18
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
19
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
20
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!

विविध रोगांचे आक्रमण : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांकडून बागा उद्ध्वस्त करण्याचा सपाटा डाळिंबाचे आगार ‘तेल्या’ने बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:22 IST

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण.

ठळक मुद्देडाळिंबाचे आगार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरशेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण..... कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा अस्मानी संकटामुळे तिहेरी कात्रीत सापडून कर्जाच्या बोजाखाली दबल्या गेलेल्या बळीराजाला नैराश्य येऊन कधीकाळी आर्थिक सुबत्ता आणलेल्या डाळिंब पिकावर कुºहाड लावल्याने डाळिंबाचे आगार आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तेल्याच्या आक्रमणामुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे बेजार झाल्याने बागलाणमधील मोसम, तांदूळवाडी, दरेगाव, आरम, करंजाडी, काटवन खोºयातून हद्दपार होत असल्याचे भयावह चित्र निदर्शनास आले आहे. बागलाण हा तसा गिरणा, मोसम, आरम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी ,दोध्याड या कधीकाळी बारमाही वाहणाºया नद्यांमुळे सुपीक तालुका. अवकाळी पाऊस आणि गारपीट ग्रहण पिछाच सोडत नसल्यामुळे शेतकºयाची अक्षरश: कमाईच बसली. लालचुटूक डाळिंबाचा आदल्या दिवशी सौदा व्हायचा आणि रात्रीतून याच पिकावर तेल्याचे आक्रमण तर कधी गारपीट अशा वारंवार येणाºया अस्मानी संकटामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत गेला.तब्बल वीस वर्षं डाळिंबाचा बोलबाला ...बागलाण तालुक्यात डाळिंब पीक लागवडीला शासकीय आकडेवारीनुसार राष्ट्रीय फळ लागवड योजनेंतर्गत १९९३ पासून खºया अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात बागलाणमधील काटवन, करंजाडी, पूर्व बागलाण व गिरणा काठ परिसरात डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात झाली. भरघोस उत्पादन आणि पैसा देणारे पीक म्हणून डाळिंब शेतकºयाच्या पसंतीस उतरले. कमी खर्चात चांगला पैसा मिळत गेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकºयाच्या घरात अक्षरश: लक्ष्मीच नांदू लागली. पैसा आल्यामुळे शेतातील छप्परच्या घराची जागा टोलेजंग बंगल्यांनी घेतली.आर्थिक सुबत्तेमुळे अनेक शेतकºयांनी माळरान विकसित करून डाळिंब पिकाची यशस्वी शेती केली. शासकीय आकडेवारीनुसार २०१४ पर्यंत तब्बल सव्वीस हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाने व्यापले गेले. भरघोस पीक घेण्याच्या नादात आणि दुकानदारांनी कोणतेही औषध विक्रीसाठी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या सल्ल्यामुळे चांगली कमाई देणाºया पिकावर तेल्यासारख्या महाभयंकर रोगाने आक्रमण केले.नैराश्यातून हल्लाबोल ...डाळिंबाचे हे आगार तेल्याचे आक्रमण, अवकाळी पाऊस, गारपीट या अस्मानी संकटाबरोबरच वारंवार सीमाबंद आणि नोटाबंदी या सुलतानी संकटामुळे बेजार झाल्याचे चित्र आहे. वारंवार बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या देशांची सीमा बंद केल्यामुळे निर्यात रोखली जाते. परिणामी डाळिंबाचा उठाव कमी होऊन बाजारभाव गडगडतात. गेल्या वर्षी नोटाबंदीच्या निर्णयामुळे हवाला पद्धतीवर त्याचा मोठा परिणाम होऊन परदेशी व्यापाºयांनी काढता पाय घेतल्यामुळे डाळिंबाचा उठाव कमी होऊन त्याचे भावावर परिणाम झाले. दरम्यान, डाळिंबाला २०१३ पासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे ग्रहण लागले आहे. यामुळे तेल्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन बागांचे बहुतांशी नुकसान झाले. सातत्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही हातात बँकेच्या कर्जाची नोटीसच मिळते. या नैराश्यातून बळीराजाने आता पिकावरच राग काढत उभ्या पिकाला कुºहाड लावून झाड उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला आहे.