शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

विविध रोगांचे आक्रमण : कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकºयांकडून बागा उद्ध्वस्त करण्याचा सपाटा डाळिंबाचे आगार ‘तेल्या’ने बेजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:22 IST

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण.

ठळक मुद्देडाळिंबाचे आगार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावरशेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी

नामपूर/सटाणा : वेळ : सकाळी १० वाजता ठिकाण : तांदूळवाडी ता. बागलाण तेल्यासारख्या महाभयंकर रोगाच्या आक्रमणामुळे त्रस्त ...वारंवार होणाºया सीमा बंदी तर कधी नोटाबंदी अशा सुलतानी संकटामुळे बाजारभावात होणारी घसरण..... कधी गारपीट, अवकाळी पाऊस अशा अस्मानी संकटामुळे तिहेरी कात्रीत सापडून कर्जाच्या बोजाखाली दबल्या गेलेल्या बळीराजाला नैराश्य येऊन कधीकाळी आर्थिक सुबत्ता आणलेल्या डाळिंब पिकावर कुºहाड लावल्याने डाळिंबाचे आगार आता उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. तेल्याच्या आक्रमणामुळे आणि शासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे बेजार झाल्याने बागलाणमधील मोसम, तांदूळवाडी, दरेगाव, आरम, करंजाडी, काटवन खोºयातून हद्दपार होत असल्याचे भयावह चित्र निदर्शनास आले आहे. बागलाण हा तसा गिरणा, मोसम, आरम, करंजाडी, हत्ती, कान्हेरी ,दोध्याड या कधीकाळी बारमाही वाहणाºया नद्यांमुळे सुपीक तालुका. अवकाळी पाऊस आणि गारपीट ग्रहण पिछाच सोडत नसल्यामुळे शेतकºयाची अक्षरश: कमाईच बसली. लालचुटूक डाळिंबाचा आदल्या दिवशी सौदा व्हायचा आणि रात्रीतून याच पिकावर तेल्याचे आक्रमण तर कधी गारपीट अशा वारंवार येणाºया अस्मानी संकटामुळे शेतकरी दिवसेंदिवस कर्जबाजारी होत गेला.तब्बल वीस वर्षं डाळिंबाचा बोलबाला ...बागलाण तालुक्यात डाळिंब पीक लागवडीला शासकीय आकडेवारीनुसार राष्ट्रीय फळ लागवड योजनेंतर्गत १९९३ पासून खºया अर्थाने सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात बागलाणमधील काटवन, करंजाडी, पूर्व बागलाण व गिरणा काठ परिसरात डाळिंब लागवड मोठ्या प्रमाणात झाली. भरघोस उत्पादन आणि पैसा देणारे पीक म्हणून डाळिंब शेतकºयाच्या पसंतीस उतरले. कमी खर्चात चांगला पैसा मिळत गेल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकºयाच्या घरात अक्षरश: लक्ष्मीच नांदू लागली. पैसा आल्यामुळे शेतातील छप्परच्या घराची जागा टोलेजंग बंगल्यांनी घेतली.आर्थिक सुबत्तेमुळे अनेक शेतकºयांनी माळरान विकसित करून डाळिंब पिकाची यशस्वी शेती केली. शासकीय आकडेवारीनुसार २०१४ पर्यंत तब्बल सव्वीस हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाने व्यापले गेले. भरघोस पीक घेण्याच्या नादात आणि दुकानदारांनी कोणतेही औषध विक्रीसाठी चुकीच्या पद्धतीने दिलेल्या सल्ल्यामुळे चांगली कमाई देणाºया पिकावर तेल्यासारख्या महाभयंकर रोगाने आक्रमण केले.नैराश्यातून हल्लाबोल ...डाळिंबाचे हे आगार तेल्याचे आक्रमण, अवकाळी पाऊस, गारपीट या अस्मानी संकटाबरोबरच वारंवार सीमाबंद आणि नोटाबंदी या सुलतानी संकटामुळे बेजार झाल्याचे चित्र आहे. वारंवार बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान या देशांची सीमा बंद केल्यामुळे निर्यात रोखली जाते. परिणामी डाळिंबाचा उठाव कमी होऊन बाजारभाव गडगडतात. गेल्या वर्षी नोटाबंदीच्या निर्णयामुळे हवाला पद्धतीवर त्याचा मोठा परिणाम होऊन परदेशी व्यापाºयांनी काढता पाय घेतल्यामुळे डाळिंबाचा उठाव कमी होऊन त्याचे भावावर परिणाम झाले. दरम्यान, डाळिंबाला २०१३ पासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे ग्रहण लागले आहे. यामुळे तेल्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन बागांचे बहुतांशी नुकसान झाले. सातत्याने मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही हातात बँकेच्या कर्जाची नोटीसच मिळते. या नैराश्यातून बळीराजाने आता पिकावरच राग काढत उभ्या पिकाला कुºहाड लावून झाड उद्ध्वस्त करण्याचा सपाटाच लावला आहे.