शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
2
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
3
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
4
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
6
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
7
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
8
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
9
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
10
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
11
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
12
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
13
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
14
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
15
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
16
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
17
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
18
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
19
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
20
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 

सटाणा तहसीलवर हल्लाबोल

By admin | Updated: September 1, 2016 23:53 IST

ग्रामस्थांचा संताप : बिलपुरी येथील विवाहिता खून प्रकरण

सटाणा : पत्नीचा लोखंडी तीक्ष्ण हत्त्याराने खून करूनही खुनी पतीच्या बचावासाठी मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपविभागीय अधिकारी व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी संगनमत करून मोटारसायकल अपघात दाखवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मुलीचे माहेर असलेल्या बिलपुरी ग्रामस्थांचा आहे. आरोपीला पाठीशी घालणाऱ्या या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना अटक करून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी (दि. १) या विवाहितेचे माहेर असलेल्या बिलपुरी येथील संतप्त सातशे ते आठशे महिला-पुरु षांनी मोर्चा काढून तहसील कार्यालयावर हल्लाबोल केला.दरम्यान, येत्या ६ सप्टेंबरपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास ७ सप्टेंबर रोजी बिलपुरीचे ग्रामस्थ आपल्या मुलाबाळांसह अन्न- पाण्याचा त्याग करून गावातच उपोषण करणार असल्याचा इशारा दिला.पत्नीचा खून करणाऱ्या आरोपीला पाठीशी घालणारे पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक नखाते व जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक झालीच पाहिजे, अशा घोषणा देत शहरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून बिलपुरी, बोढरी, चिराई, टेंभे येथील ग्रामस्थांनी डॉ. शेषराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली धडक मोर्चा काढला. या मोर्चात सुमारे सातशे ते आठशे महिला व पुरुष सहभागी झाले होते. ताहराबाद रोड या प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयावर मोर्चा नेऊन हल्लाबोल केला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी घटनेचा निषेध करत सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांनी मृत सविताच्या नातेवाइकांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप केला. दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांवर पुरावा नष्ट करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येत्या ६ सप्टेंबरपर्यंत अटक न केल्यास ७ सप्टेंबरपासून बिलपुरीचे ग्रामस्थ आपल्या कुटुंबीयांसह अन्न-पाण्याचा त्याग करून आमरण उपोषण करतील, असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला. तहसीलदार सुनील सौंदाणे यांनी मोर्चेकऱ्यांना सामोरे जात घडलेला प्रकार निंदनीय असल्याचे सांगून आपल्या भावना जिल्हाधिकारी यांच्याकडे पोहचवून आपल्याला न्याय मिळेल यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असेल, असे सांगतले. मोर्चात डॉ. शेषराव पाटील यांच्यासह बिलपुरीचे सरपंच सतीश पवार, जिल्हा परिषेदेचे माजी सदस्य विक्रम मोरे, अण्णा मोरे, साहेबराव पवार, विठ्ठल पवार, नूतन अहेर, सुनंदा पवार, जिजा पवार, इंदू पवार, यशोदा पवार, अंजना पवार, सीमा पवार, उषा पवार, रेश्मा पवार, सखूबाई पवार, उज्ज्वला पवार, सुषमा पवार, निर्मला पवार, शोभा अहिरे, वंदना अहिरे, वैशाली अहिरे, संगीता चव्हाण, ललिता शेवाळे यांच्यासह सातशे ते आठशेच्या संख्येने महिला-पुरु ष सहभागी झाले होते. बागलाण तालुक्यातील बिलपुरी येथील सविता पवार हिचा विवाह आठ वर्षांपूर्वी गोराणे येथील अरविंद श्रावण देसले याच्याशी झाला होता. सवितापासून अरविंदला एक मुलगीही आहे. मुलगा पाहिजे म्हणून त्यांचे खटकेही उडत होते. दोघांचा तंटामुक्ती समिती व नातेवाइकांनी नऊ महिन्यांपूर्वी समझोता करून सविताला सासरी नांदायला पाठवले होते. दरम्यान, गेल्या ?? जुलै रोजी सासरच्यांनी सविताला माहेरी बिलपुरीला कार्यक्रमासाठी पाठविले होते. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी रात्री ? वाजता अरविंद मोटारसायकलवर गोराण्याला जातो म्हणून घेऊन गेला. आणि पहाटे ? वाजता आसखेडा-गोराणे या रस्त्यावर अपघात झाल्याचे कळविण्यात आले होते. मात्र हा प्रकार संशयास्पद असून, सविताचा घातपात झाल्याची तक्रार करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी बिलपुरीच्या ग्रामस्थांनी केली होती. मात्र जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर यांनी हा अपघातच असल्याचे सांगून आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्रामस्थांनी मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी केली. मात्र त्यांनीदेखील हा अपघातच असल्याचे सांगून सहायक पोलीस निरीक्षक होळकर यांची बाजू लावून धरली. (वार्ताहर)