शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
2
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
3
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
4
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
5
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
6
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
7
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
8
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
9
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
10
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
11
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
12
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
13
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
14
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
15
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
16
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
17
वेसावकरांनी भाल्याने फोडली हंडी; डोंगरीकर तरुण मंडळाला ९ वर्षांनी मिळाला मान
18
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
19
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
20
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला

‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 00:07 IST

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देयेवल्याला ठेंगा जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवात

नाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती.या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.‘हल्लाबोल’चा धसका; बागलाणला टॅँकरयेवल्याला ठेंगा : जिल्ह्यात पाणीटंचाईला सुरुवातनाशिक : गेल्या दीड वर्षापासून पाणीटंचाईचा सामना करणाºया बागलाणवासीयांना अखेर राष्टÑवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासाठी तीन टॅँकर मंजूर केले असून, रविवारपासून तहानलेल्या गावांना टॅँकर सुरू होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात चांगला पाऊस झाला असला तरी येवला व बागलाण तालुक्यांतील काही भागांत अखेरपर्यंत पावसाने पाठशिवणीचा खेळ खेळल्यामुळे जानेवारी महिन्यांपासूनच या तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली. ग्रामपंचायतींनी ठराव करून पंचायत समितीकडे पाठविले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकाºयांनी संबंधित गावांना भेटी देऊन टंचाई असल्याची खात्री केली होती व तसा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे पाठविला.परंतु जानेवारीत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते यावर विश्वास न ठेवणाºया प्रशासनाने टॅँकर मागणीच्या प्रस्तावात त्रुटी काढून चालढकल चालविली होती. या संदर्भात स्थानिक आमदारांनीही पाठपुरावा केला तरीही प्रशासन धजावत नव्हते.राज्य सरकारच्या विरोधात राष्टÑवादी कॉँग्रेसने उत्तर महाराष्टÑात हल्लाबोल यात्रा काढली असून, रविवारी ही यात्रा सटाणा येथे पोहोचणार आहे. यावेळी पाणीटंचाईचा सामना करणाºया ग्रामस्थांकडून सरकार व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांविरुद्ध तक्रारी होण्याची शक्यता आहे. पाणीटंचाई व पाण्याचा टॅँकर हा हल्लाबोल यात्रेचा मुद्दा होऊ नये म्हणून शनिवारी अखेर बागलाण तालुक्यातील खिरमाणे, चौगाव, गोराणे या तीन गावांसाठी टॅँकर मंजूर करण्यात आले आहेत. राष्टÑवादीची हल्लाबोल यात्रा शुक्रवारी येवला येथेही झाली; परंतु तेथे मात्र प्रशासनाने टॅँकर मंजूर केले नसल्याने प्रशासन पाणी टॅँकर मंजुरीत राजकारण करते काय? असा सवाल केला जात आहे.