शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
3
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
4
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
5
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
6
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
7
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
8
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
9
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
10
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
11
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
12
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
13
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
14
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
15
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
16
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
17
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
18
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
19
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
20
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Daily Top 2Weekly Top 5

वावी महाराष्ट्र बँक शाखेचे एटीएम धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:24 IST

वावी हे दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे गाव असून येथील आठवडे बाजार तसेच परिसरात व्यापारी वर्ग मोठा असल्याने खातेदारांची संख्यादेखील ...

वावी हे दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे गाव असून येथील आठवडे बाजार तसेच परिसरात व्यापारी वर्ग मोठा असल्याने खातेदारांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. वावी शाखेशी वावीसह आसपासच्या ३० ते ३५ गावांचा संपर्क असल्यामुळे शाखेत सकाळी दहा वाजेपासून खातेदार गर्दी करायला सुरुवात करतात. शाखेत जागा कमी असल्यामुळे एक-एक तास ग्राहकांना पैसे काढणे व टाकण्यासाठी ताटकळत थांबावे लागते. अशा परिस्थितीत एटीएम असल्यावर थोडीफार का होईना गर्दी कमी होईल या उद्देशाने सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी शाखेने एटीएम सुरू केले होते. मात्र महामार्गाचे रुंदीकरणाच्या कामात आलेले हे एटीएम बंद करण्यात आले. त्यानंतर एटीएमसाठी अहिल्यादेवी चौक याठिकाणी जागाही निश्चित करण्यात आल्याचे समजते. वरिष्ठांकडून जागेची पाहणीदेखील करण्यात आली आहे. मात्र संबंधित अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल न घेता गेली सहा महिन्यांपासून एटीएमबाबत बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वावी शाखेचे एटीएम त्वरित सुरू करून खातेदारांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील खातेदारांकडून होत आहे.

चौकट -

वावी येथील महाराष्ट्र बँक शाखेचे एटीएम गेल्या सहा महिन्यापासून बंद असून यासंदर्भात वावी शाखेसह नाशिक झोनल अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून देखील कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. खातेदारांची मोठ्या प्रमाणात तारांबळ होत असून पैसे काढण्यासाठी १-२ तास ताटकळत उभे राहावे लागते. खातेदारांचा हा वेळ वाचवण्यासाठी एटीएम तत्काळ सुरू करणे गरजेचे आहे.

-संतोष जोशी, तालुका उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी