शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अथर्व रॉयल्स चॅम्पियन

By admin | Updated: December 31, 2016 01:34 IST

लोकमत एनपीएल सीझन ६ : संदीप फाल्कन्सवर मात

नाशिक : राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सीझन-६ च्या अंतिम सामन्यात अथर्व रॉयल्सने संदीप फाल्कन्सचा ५२ धावांनी पराभव करीत स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले असून, अथर्व रॉयल्सच्या १६५ धावांचा पाठलाग करताना अवघ्या ११३ धावांत गारद झालेल्या संदीप फाल्कन्सच्या संघाला उपविजेते पद मिळाले. अथर्व रॉयल्सची ढासळलेली फलंदाजी सावरत विजयाच्या दिशेने नेणारा मयूर वाघ सामनावीर ठरला.  संदीप फाल्कन्सचा कर्णधार मनोज परदेशीने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत अथर्व रॉयल्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिल्यानंतर अथर्व रॉयल्सने मयूर वाघच्या वादळी शतकाच्या जोरावर संदीप फाल्कन्ससमोर विजयासाठी १६६ धावांचे लक्ष्य ठेवले. या लक्ष्याचा पाठलाग क रताना संदीप फाल्कनचा संपूर्ण संघ १७. ३ षटकांमध्ये सर्वबाद ११३ धावाच करू शकल्याने या संघाला ५२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी संदीप फाल्कन्सच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत अथर्व रॉयल्सच्या फलंदाजांना बांधून ठेवत ठरावीक अंतराने एकामागून एक धक्के दिले. स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक धावांचा विक्रम करणाऱ्या स्वप्नील राठोडला अमित लहामगेने १७ धावांवर त्रिफळाचित केले, तर प्रतीक भालेरावने कपिल शिरसाठलाही आठ धावांवर तंबूत धाडले. राहुल विश्वकर्मा अवघ्या ४ धावांवर तुषार इंद्रीकरचा बळी ठरला. कर्णधार वैभव केंदळेही विशेष कामगिरी करू शकला नाही. त्याला अमित लहामगेने ७ धावांवर प्रतीक भालेरावकरवी झेलबाद केले. अथर्व रॉयल्सची पडझड झाल्यामुळे हा संघ शतकी धावसंख्याही उभारू शकतो की नाही अशी स्थिती निर्माण झाली असताना मैदानावर उतरलेल्या मयूर वाघने तुफान फ लंदाजी केली. त्याने चौफे र फटके बाजी करताना ३९ चेंडूंवर ११ वेळा चेंडू सीमापार पाठवत ६ चौकार आणि ५ षटकार टोलवत ६८ धावा फटकावल्या. त्याला सुनील पटेलने १७ चेंडूंमध्ये २ चौकार व १ षटकारासह २४ धावांचे महत्त्वाची साथ दिली. समाद अत्तरनेही अवघ्या ५ चेंडूत ३ चौकारांसह झटपट १५ धावा केल्या. त्यामुळे अथर्व रॉयल्सला संदीप फाल्कन्ससमोर विजयासाठी १६६ धावांचे आव्हान उभे करता आले. अथर्व रॉयल्सकडून सर्वाधिक धावा करणारा मयूर वाघ याची अंतिम सामन्यातील धडाकेबाज खेळी एनपीएलच्या फायनलमध्ये अविस्मरणीय बनली असून, त्याच्या खेळीच्या जोरावर अथर्व रॉयल्स संघाला २० षटकांमध्ये ७ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारता आली. संदीप फाल्कन्सकडून गोलंदाजी करताना मेहारज सय्यदने ४ षटकांमध्ये ३५ धावा देऊन २ बळी मिळवले. प्रतीक भालेरावने ४ षटकांमध्ये २८ धावा देत एक गडी बाद केला. मोहन केसीने ४ षटकांमध्ये २० धावा दिल्या. अमित लहामगेने ३ षटकांमध्ये १६ धावा देत २ बळी घेतले. रोहित भोरेने १ षटकात ९ व सागर लभडेने १ षटकात १७ धावा दिल्या. अथर्व रॉयल्सने दिलेल्या १६६ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या संदीप फाल्कन्सचा सलामीवीर राहुलने ३२ धावा काढून संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला.परंतु त्याचा साथीदार मुझफ्फर सय्यतद अवघ्या १३ धावा काढून बाद झाला. सुजय महाजनने ३३ धावांचे चांगले योगदान दिले. परंतु त्याच्यानंतर १३ धावा करणारा तुषार इंद्रीकरशिवाय कोणताही फलंदात दोन अंकी धावसंघ्या करू शकला नाही. अखेरीस फ लंदाजांची फळी तळाला पोहोचल्यानंतर तुषार उंच फटका खेळून झेल बाद झाला. त्यामुळे संदीप फाल्कन्सला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करताना उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले. (प्रतिनिधी)