शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत : अपुरे मनुष्यबळ

By admin | Updated: April 2, 2017 21:06 IST

सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे.

नाशिक : सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामकाज चालते. इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाबाबत शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे, शैक्षणिक समन्वयक, संच, शाळा व शिक्षक मान्यता देणे, तसेच अध्यापक विद्यालयांची कार्यवाही करणे आदि कामकाज या कार्यालयामार्फत चालते. शैक्षणिक कामकाजासंदर्भातील संगणकीय कामे तसेच न्यायालयीन कामे आणि इतर कामांचाही मोठा ताण या कार्यालयात असतो. परंतु कमी मनुष्यबळावरच येथील कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते. विशेषत: शैक्षणिक वर्ष सुरू होताना कार्यालयात चारही जिल्ह्यांतून कामकाजाचा मोठा ताण वाढतो. तसेही वर्षभर अनेक महत्त्वाची कामे सुरूच असतात. मात्र कमी मनुष्यबळ असल्याने वेळेत कामे पूर्ण करण्याच्याही अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या तरतुदीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने करार पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठीचे आवाहन केले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या करारावर सेवेसाठी घेतले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाच्या कामकाजाचा अनुभव असल्याने कामकाज करणे सुलभ होते असल्याने शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्यांना काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.