शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

शिक्षण विभाग घेणार सेवानिवृत्तांची मदत : अपुरे मनुष्यबळ

By admin | Updated: April 2, 2017 21:06 IST

सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे.

नाशिक : सन २०१२ पासून नवीन कर्मचारी भरती करण्यात आली नसल्यामुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाला अपुऱ्या मनुष्यबळावर कामकाज करावे लागत आहे. ही पोकळी भरून काढण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे ठरविले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना करार पद्धतीने नियुक्ती देण्यात येणार आहे. नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार अशा चार जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या शिक्षण उपसंचालक कार्यालयात मोठ्या प्रमाणात कामकाज चालते. इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतच्या शालेय शिक्षणाबाबत शासकीय धोरणांची अंमलबजावणी करणे, शैक्षणिक समन्वयक, संच, शाळा व शिक्षक मान्यता देणे, तसेच अध्यापक विद्यालयांची कार्यवाही करणे आदि कामकाज या कार्यालयामार्फत चालते. शैक्षणिक कामकाजासंदर्भातील संगणकीय कामे तसेच न्यायालयीन कामे आणि इतर कामांचाही मोठा ताण या कार्यालयात असतो. परंतु कमी मनुष्यबळावरच येथील कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते. विशेषत: शैक्षणिक वर्ष सुरू होताना कार्यालयात चारही जिल्ह्यांतून कामकाजाचा मोठा ताण वाढतो. तसेही वर्षभर अनेक महत्त्वाची कामे सुरूच असतात. मात्र कमी मनुष्यबळ असल्याने वेळेत कामे पूर्ण करण्याच्याही अडचणी निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाच्या तरतुदीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने करार पद्धतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची नियुक्तीसाठीचे आवाहन केले आहे. शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांच्या करारावर सेवेसाठी घेतले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांना संबंधित विभागाच्या कामकाजाचा अनुभव असल्याने कामकाज करणे सुलभ होते असल्याने शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालेल्यांना काम करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते.