शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

‘समृद्धी’ला जमीन देण्यास सिन्नर आघाडीवर मूल्यांकन प्रारंभ : आठवड्यात घेणार जागेचा ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:44 IST

नाशिक : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला जमीन मोजणीपासूनच विरोध करून अधिकाºयांना पिटाळून लावणाºया सिन्नर तालुक्यातच या महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने पुढे आल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांना हायसे वाटू लागले असून, दोन दिवसांपूर्वी जवळपास २२५ शेतकºयांनी एकत्र येत लेखी निवेदनाद्वारे जमीन देण्याची तयारी दर्शविल्याने या जमिनीचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे.

नाशिक : मुंबई-नागपूर ‘समृद्धी’ महामार्गाला जमीन मोजणीपासूनच विरोध करून अधिकाºयांना पिटाळून लावणाºया सिन्नर तालुक्यातच या महामार्गासाठी जमीन देण्यासाठी शेतकरी मोठ्या संख्येने पुढे आल्यामुळे प्रशासनातील अधिकाºयांना हायसे वाटू लागले असून, दोन दिवसांपूर्वी जवळपास २२५ शेतकºयांनी एकत्र येत लेखी निवेदनाद्वारे जमीन देण्याची तयारी दर्शविल्याने या जमिनीचे मूल्यांकन सुरू करण्यात आले आहे.समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्णातील शेतकºयांचा यापूर्वीचा विरोध हळूहळू मावळत चालल्याचे दिसू लागले असून, गेल्या आठवड्यात पंधरा शेतकºयांकडून थेट खरेदीचा शुभारंभ झाल्यानंतर अन्य गावांतील शेतकºयांकडूनही त्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे सिन्नर तालुक्यातून समृद्धी महामार्गासाठी सर्वाधिक विरोध यापूर्वी करण्यात आला होता. अधिकाºयांना ड्रोनद्वारे जमिनीची मोजणीही न करू देणाºया ग्रामस्थांनी मोजणी करण्यास येणाºया अधिकाºयांना पिटाळून लावले होते तसेच जमिनीवरच सरण रचून प्रशासनावर विरोधाचा दबाव कायम ठेवला होता. परंतु राज्य रस्ते विकास महामंडळाने जमिनींचे दर जाहीर केल्यानंतर शेतकºयांचा विरोध मावळत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी गोंदे, मºहळ बुद्रुक, मºहळ खुर्द, खंबाळे, सायाळे, दातली आदी लगतच्या गावातील शेतकºयांनी एकत्र येत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन जमीन विक्रीची तयारी दर्शविली आहे. सिन्नरच्या मानाने इगतपुरी तालुक्यातील शेतकरी जमिनी देण्यास अद्याप फारसे पुढे आलेले नाहीत. मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे आणखी एका शेतकºयाने थेट खरेदी दिली आहे. १३ कोटी अदाशेतकºयांचा मिळणारा प्रतिसाद पाहता ज्यांनी जागा देण्याची तयारी दर्शविली त्यांच्या गटनिहाय व गटातील मालमत्तेचे मूल्यांकन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जमिनी खरेदी केल्यानंतर तत्काळ शेतकºयाच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येत असल्याने गेल्या आठवड्यात १३ कोटी रुपये जमिनीचा मोबदला अदा करण्यात आला आहे. शासनाने समृद्धीसाठी पैसे कमी न पडू देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्यामुळे येत्या आठवड्यात पुन्हा काही शेतकºयांच्या जमिनींचे व्यवहार पूर्ण केले जातील, अशी माहिती समृद्धीचे समन्वयक विठ्ठल सोनवणे यांनी दिली आहे.