शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
2
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
3
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
4
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
5
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
6
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
7
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
8
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
9
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
10
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
11
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
12
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
13
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
14
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
15
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
16
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
17
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
18
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
19
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
20
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?

सव्वा दोनशे कोटींचे डांबरी रस्ते पुन्हा न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:14 IST

नाशिक- शहरातील सव्वादाेनशे कोटी रुपयांच्या रस्त्यांना स्थायी समितीने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली असली तरी या प्रकरणी उच्च न्यायालयाचा ससेमिरा ...

नाशिक- शहरातील सव्वादाेनशे कोटी रुपयांच्या रस्त्यांना स्थायी समितीने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली असली तरी या प्रकरणी उच्च न्यायालयाचा ससेमिरा मात्र सुटलेला नाही. विशिष्ट ठेकेदारांनाच हे काम मिळावे यासाठी डांबरांच्या प्लांटसाठी घातलेली अट प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना भोवण्याची शक्यता आहे. दोन नगरसेवकांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात धाव घेतली असून त्यामुळे पुन्हा अडथळा वाढण्याची शक्यता आहे.

पंचवटीतील नगरसेविका विमल पाटील आणि नंदिनी बोडके यांनी ही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी (दि.९) त्यावर सुनावणी होणार होती. मात्र, संबंधित न्यायमूर्तींनी दुसऱ्या वरिष्ठ न्यायमंचाकडे ती वर्ग केली आहे. आता ११ फेब्रुवारीस त्यावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील संदीप शिंदे यांनी सांगितले.

शहरात नवीन रस्ते करण्याच्या नावाखाली तब्बल २२५ कोटी रुपयांच्या रस्ता कामाच्या निविदा महापालिका प्रशासनाने डिसेंबर महिन्यात काढल्या होत्यात. त्यात निविदा भरणाऱ्या ठेकेदाराचा डांबराचा प्लांट हा शहरापासून तीस किलो मीटर अंतराच्य आत असावा अशी अट घालण्यात आली आणि निविदा दाखल करण्यापूर्वीच यासंदर्भात महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून अंतराचे प्रमाणपत्र घेणे सक्तीचे करण्यात आले. त्यामुळे निविदा भरण्याआधीच ठेकेदारांना आपले स्पर्धक कोण आहेत, हे तर कळू शकतेच परंतु संबंधितांवर दबाव देखील आणता येऊ शकतो. अशा प्रकारच्या अटीमुळे निकोप स्पर्धा होऊ शकत नाही. त्यातही व्यावहारिक भाग म्हणजे जर एखाद्याला ठेका मिळालाच नाही तर अगोदरच प्लांट टाकून खर्च कोण करणार असा प्रश्न होता. निविदा काढताना त्या वेबसाईटवर टाकून ग्लेाबल करण्यात आल्या परंतु स्थानिक ठेकेदारांनाच काम मिळावे यासाठी शक्कल लढवण्यात आली होती. यासंदर्भात एका ठेकेदार कंपनीने उच्च न्यायलयात याचिका दाखल केली हेाती. त्यावरील सुनावणी फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार हेाती. मात्र, त्या कंपनीने माघार घेतल्याने प्रशासनाने घाईघाईने निविदा प्रक्रिया पूर्ण केली आणि गेल्या आठवड्यात तर स्थायी समितीने यासंदर्भतील प्रस्ताव प्रत्यक्ष पटलावर येऊ न देताच सर्व प्रस्ताव मंजूर असल्याचे घोषित केले. मात्र आत हीच प्रक्रिया अडचणीची ठरणार आहे.

...इन्फो...

काय आहेत आक्षेप?

महापाालिकेने निविदा काढताना डांबरी प्लांट अगोदरच सुरू करण्याच्या अटीमुळे निकोप स्पर्धा हेाऊ शकत नाही, हा मूळ आक्षेप असून त्यामुळे नव्याने निविदा प्रक्रीया राबवण्यासाठी याचिकेत विनंती करण्यात आली आहे.