शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

रेल्वे प्रकल्प रद्दबाबत महसूलमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:57 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा विरोध कायम : इगतपुरी तालुक्यात गावागावांत बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांमधून ही रेल्वे लाइन जात आहे तेथील शेतकºयांच्या या आधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच इतर जमिनी औद्योगिक वसाहत, धरणे, महामार्ग यासाठी संपादित केल्या आहे. यामुळे आता या रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.येथील शेतकºयांनी या रेल्वे प्रकल्पाला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेक शेतकºयांचा उदरनिर्वाह चालत आहे. शासन जर हाती असलेली ही जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असेल तर आम्हाला भूमिहीन झाल्याशिवाय पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे व तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्यात यावा, असे साकडे घातले.यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळ, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, जनार्दन माळी, कचरू पाटील शिंदे, बाळासाहेब कुकडे, अरुण गायकर, निवृत्ती कातोरे, कमलाकर नाठे, ज्ञानेश्वर पागेरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात