शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रेल्वे प्रकल्प रद्दबाबत महसूलमंत्र्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 00:57 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचा विरोध कायम : इगतपुरी तालुक्यात गावागावांत बैठका

लोकमत न्यूज नेटवर्कनांदूरवैद्य : इगतपुरी ते मनमाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या रेल्वेमार्गाच्या दुतर्फा असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत इगतपुरी तालुक्यातील कुºहेगाव, पाडळी देशमुख, मुकणे, नांदूरवैद्य तसेच नाशिक तालुक्यातील वंजारवाडी व लोहशिंगवे येथे रेल्वे प्रकल्प अधिकारी व शेतकरी यांच्यात बैठका पार पडल्या. मात्र तालुक्यातील शेतकºयांनी आक्रमक पवित्रा घेत या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. याप्रश्नी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करावा अशी मागणी निवेदन त्यांच्याकडे करण्यात आली आहे.इगतपुरी तालुक्यातील ज्या गावांमधून ही रेल्वे लाइन जात आहे तेथील शेतकºयांच्या या आधीच शासनाने लष्कराच्या गोळीबार प्रशिक्षणासाठी हजारो हेक्टर जमिनी संपादित केल्या आहेत. तसेच इतर जमिनी औद्योगिक वसाहत, धरणे, महामार्ग यासाठी संपादित केल्या आहे. यामुळे आता या रेल्वे प्रकल्पासाठी पुन्हा जमिनी संपादित होणार असल्यामुळे येथील शेतकरी भूमिहीन होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.येथील शेतकºयांनी या रेल्वे प्रकल्पाला विरोध कायम ठेवत प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली आहे. येथील शेतकºयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या ज्या उर्वरित जमिनी शिल्लक आहेत त्यावरच अनेक शेतकºयांचा उदरनिर्वाह चालत आहे. शासन जर हाती असलेली ही जमीनही रेल्वे प्रकल्पासाठी संपादित करत असेल तर आम्हाला भूमिहीन झाल्याशिवाय पर्याय नाही. या पार्श्वभूमीवर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कुकडे व तालुकाध्यक्ष रामदास धांडे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन निवेदन देऊन हा प्रकल्प बंद करण्यात यावा, असे साकडे घातले.यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळ, शिरीष कोतवाल, अनिल आहेर, जनार्दन माळी, कचरू पाटील शिंदे, बाळासाहेब कुकडे, अरुण गायकर, निवृत्ती कातोरे, कमलाकर नाठे, ज्ञानेश्वर पागेरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात