शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

पांगरी येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:05 IST

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमहिलांची पायपीट । अनियमित वीजपुरवठ्याचा परिणाम

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.विजेचे भारनियमन तसेच वीज असल्यास त्यावेळी अत्यंत कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे जलकुंभ भरण्यासाठी दोन ते चार दिवस लागत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. पांगरी गावात एकूण सुमारे वीसच्या आसपास चौक आहेत. एकदा जलकुंभ भरला तर चार ते पाच गल्ल्यांना पाणी जाते. तसेच पाणी सोडता त्यावेळी ही जलकुंभ भरणे चालू असते त्यामुळे दाब पूर्णपणे राहातो; परंतु असे ना होता अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने जलकुंभ भरणे व पाणी सोडण्यासाठी कर्मचाऱ्याला ताळमेळ साधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गावाला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, एक गल्लीला पाणी आल्यानंतर त्या गल्लीला परत पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी-नाले, बंधारे सर्व भरले असल्याने यावर्षी गावाला पाणीटंचाई भासणार नाही, असे वाटत होते. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी रवि पगार, आत्माराम पगार, संजय वारूळे, प्रकाशपांगारकर, सुनील निरगुडे, युनूस कादरी, नीलेश पगार, सुनील पेखळे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्गाने केली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाही. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणांचे नुकसान होत असून, त्यांचे जळण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकºयाला एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. तसेच वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचण्याचे अगोदर वीज गायब होते. त्यामुळे पाऊस चांगला होऊनही पिके चांगली येतील याचा भरवसा शेतकऱ्यांना राहिला नाही.नसून वीज व बदलते हवामानामुळे शेतकरी हैराण झाला आहे.कमी दाबाने होणाºया वीजपुरवठ्यामुळे जलकुंभ भरण्यास अडचण येत असल्याने ग्राम प्रशानाला पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. वीज मंडळाने पूर्ण दाबाने वीजपुरवठा केल्यास कृत्रिम पाणीटंचाई दूर होणार आहे.- ज्ञानेश्वर पांगारकर,सरपंच, पांगरी

टॅग्स :Governmentसरकार