शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
4
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
5
Mohammed Siraj Record : मियाँ मॅजिक! सिराजनं साधला नंबर वन होण्याचा डाव; मिचेल स्टार्कला टाकले मागे
6
‘संघाला १०० वर्ष झाली तरी त्यांची ‘मुंह में राम, बगल में छुरी’ भूमिका आजही कायम, काँग्रेसची टीका    
7
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
8
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
10
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
11
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
12
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
13
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
14
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
15
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
16
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
17
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
18
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
19
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
20
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?

पांगरी येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:05 IST

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमहिलांची पायपीट । अनियमित वीजपुरवठ्याचा परिणाम

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.विजेचे भारनियमन तसेच वीज असल्यास त्यावेळी अत्यंत कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे जलकुंभ भरण्यासाठी दोन ते चार दिवस लागत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. पांगरी गावात एकूण सुमारे वीसच्या आसपास चौक आहेत. एकदा जलकुंभ भरला तर चार ते पाच गल्ल्यांना पाणी जाते. तसेच पाणी सोडता त्यावेळी ही जलकुंभ भरणे चालू असते त्यामुळे दाब पूर्णपणे राहातो; परंतु असे ना होता अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने जलकुंभ भरणे व पाणी सोडण्यासाठी कर्मचाऱ्याला ताळमेळ साधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गावाला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, एक गल्लीला पाणी आल्यानंतर त्या गल्लीला परत पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी-नाले, बंधारे सर्व भरले असल्याने यावर्षी गावाला पाणीटंचाई भासणार नाही, असे वाटत होते. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी रवि पगार, आत्माराम पगार, संजय वारूळे, प्रकाशपांगारकर, सुनील निरगुडे, युनूस कादरी, नीलेश पगार, सुनील पेखळे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्गाने केली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाही. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणांचे नुकसान होत असून, त्यांचे जळण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकºयाला एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. तसेच वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचण्याचे अगोदर वीज गायब होते. त्यामुळे पाऊस चांगला होऊनही पिके चांगली येतील याचा भरवसा शेतकऱ्यांना राहिला नाही.नसून वीज व बदलते हवामानामुळे शेतकरी हैराण झाला आहे.कमी दाबाने होणाºया वीजपुरवठ्यामुळे जलकुंभ भरण्यास अडचण येत असल्याने ग्राम प्रशानाला पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. वीज मंडळाने पूर्ण दाबाने वीजपुरवठा केल्यास कृत्रिम पाणीटंचाई दूर होणार आहे.- ज्ञानेश्वर पांगारकर,सरपंच, पांगरी

टॅग्स :Governmentसरकार