शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

पांगरी येथे कृत्रिम पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:05 IST

सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देमहिलांची पायपीट । अनियमित वीजपुरवठ्याचा परिणाम

पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे.विजेचे भारनियमन तसेच वीज असल्यास त्यावेळी अत्यंत कमी दाबाने होणारा वीजपुरवठा यामुळे जलकुंभ भरण्यासाठी दोन ते चार दिवस लागत असल्याने पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण होत आहे. पांगरी गावात एकूण सुमारे वीसच्या आसपास चौक आहेत. एकदा जलकुंभ भरला तर चार ते पाच गल्ल्यांना पाणी जाते. तसेच पाणी सोडता त्यावेळी ही जलकुंभ भरणे चालू असते त्यामुळे दाब पूर्णपणे राहातो; परंतु असे ना होता अतिशय कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने जलकुंभ भरणे व पाणी सोडण्यासाठी कर्मचाऱ्याला ताळमेळ साधण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे गावाला कृत्रिम पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, एक गल्लीला पाणी आल्यानंतर त्या गल्लीला परत पाणी येण्यासाठी पंधरा दिवसाचा कालावधी लागत आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने विहीर, नदी-नाले, बंधारे सर्व भरले असल्याने यावर्षी गावाला पाणीटंचाई भासणार नाही, असे वाटत होते. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी रवि पगार, आत्माराम पगार, संजय वारूळे, प्रकाशपांगारकर, सुनील निरगुडे, युनूस कादरी, नीलेश पगार, सुनील पेखळे आदींसह ग्रामस्थ व महिलावर्गाने केली आहे.वीजपुरवठा सुरू राहिला तर तो अत्यंत कमी दाबाने देण्यात येत असल्याने घरातील अनेक वीज उपकरणे सुरू होत नाही. त्यामुळे वीज असूनही तिचा उपयोग होत नाही. या कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती वापराच्या उपकरणांचे नुकसान होत असून, त्यांचे जळण्याचे प्रमाणात वाढ झाली आहे. शेतकºयाला एक वाफा भरण्याकरिता अर्धा तास लागत आहे. तसेच वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने शेतापर्यंत पाणी पोहोचण्याचे अगोदर वीज गायब होते. त्यामुळे पाऊस चांगला होऊनही पिके चांगली येतील याचा भरवसा शेतकऱ्यांना राहिला नाही.नसून वीज व बदलते हवामानामुळे शेतकरी हैराण झाला आहे.कमी दाबाने होणाºया वीजपुरवठ्यामुळे जलकुंभ भरण्यास अडचण येत असल्याने ग्राम प्रशानाला पाणीपुरवठा करणे अवघड झाले आहे. वीज मंडळाने पूर्ण दाबाने वीजपुरवठा केल्यास कृत्रिम पाणीटंचाई दूर होणार आहे.- ज्ञानेश्वर पांगारकर,सरपंच, पांगरी

टॅग्स :Governmentसरकार