शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

साहित्यनिर्मिती ही कला

By admin | Updated: June 29, 2015 01:43 IST

साहित्यनिर्मिती ही कला

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नाव घेऊन प्रत्येकाने आपापली भूमिका पुढे दामटल्याने आंबेडकरी साहित्याला कुंठितावस्था निर्माण झाली असून, सर्जनशील साहित्य कोणत्याही ‘वादा’त बांधले जाऊ नये. साहित्यनिर्मिती ही कला आहे. कलेला निकष आले की अवरोध निर्माण होतो. आंबेडकरी साहित्य हे सर्वसमावेशक असावे, असा सूर चर्चासत्रात निघाला. डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळाच्या वतीने ‘साहित्यलेखनाच्या कुंठितावस्थेची कारणमीमांसा व त्यावरील उपाय’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी बीजभाषण केले. प्रा. जयदेव डोळे, प्रा. अविनाश डोळस, डॉ. महेंद्र भवरे, प्रा. सत्येश्वर मोरे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. संजय मून, डॉ. अरुणा लोखंडे, प्रा. उत्तम अंभोरे, मोतीराम कटारे, डॉ. वामन गवई, कमलाकर पायस, देवेंद्र उबाळे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. साहित्याचा उगम सामाजिक चळवळीतून झाला. सामाजिक चळवळ कुंठित झाल्याचा परिणाम साहित्यावर झाला. त्यामुळे सामाजिक चळवळीसाठी लेखकांनी स्वतंत्र वेळ द्यायला हवा, असे मत डॉ. मुलाटे यांनी व्यक्त केले. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वत:ची माध्यमे निर्माण करण्याऐवजी प्रस्थापित मूल्यवादक संस्था, माध्यमांमध्ये आपले स्थान निर्माण करायला हवे. तशी पात्रता तयार करायला हवी. सर्जनशील साहित्याची निर्मिती करताना त्याला कडेकोट चौकट असता कामा नये. आंबेडकरवादाचे वैयक्तिकीकरण न करता तो सर्वसमावेशक ठेवावा, असे प्रतिपादन प्रा. जयदेव डोळे यांनी केले. डॉ. संजय मून यांनी सध्या धम्म चळवळीचे धर्मात रूपांतर न होऊ देण्याचे आव्हान धम्मापुढे उभे असल्याचे सांगितले. मानवतेच्या प्रवासाला निघालेले दलित साहित्य मध्येच अडकून पडल्याचेही ते म्हणाले, तर दलित साहित्यात बदलाची प्रक्रियाच होऊ शकली नसल्याबद्दल प्रा. अविनाश डोळस यांनी खंत व्यक्त केली. दलित साहित्यिकांनी विरोधी भूमिका ऐकून घेऊन, संवाद-चर्चेद्वारे ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. रोहित गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. वामन गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह गंगाधर अहिरे, जयवंत खडताळे, प्रमोद अहिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)