शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यनिर्मिती ही कला

By admin | Updated: June 29, 2015 01:43 IST

साहित्यनिर्मिती ही कला

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नाव घेऊन प्रत्येकाने आपापली भूमिका पुढे दामटल्याने आंबेडकरी साहित्याला कुंठितावस्था निर्माण झाली असून, सर्जनशील साहित्य कोणत्याही ‘वादा’त बांधले जाऊ नये. साहित्यनिर्मिती ही कला आहे. कलेला निकष आले की अवरोध निर्माण होतो. आंबेडकरी साहित्य हे सर्वसमावेशक असावे, असा सूर चर्चासत्रात निघाला. डॉ. आंबेडकर वाङ्मयीन अभ्यास मंडळाच्या वतीने ‘साहित्यलेखनाच्या कुंठितावस्थेची कारणमीमांसा व त्यावरील उपाय’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. व्ही. एन. नाईक महाविद्यालयात झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे यांनी बीजभाषण केले. प्रा. जयदेव डोळे, प्रा. अविनाश डोळस, डॉ. महेंद्र भवरे, प्रा. सत्येश्वर मोरे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. संजय मून, डॉ. अरुणा लोखंडे, प्रा. उत्तम अंभोरे, मोतीराम कटारे, डॉ. वामन गवई, कमलाकर पायस, देवेंद्र उबाळे आदिंनी चर्चेत सहभाग घेतला. साहित्याचा उगम सामाजिक चळवळीतून झाला. सामाजिक चळवळ कुंठित झाल्याचा परिणाम साहित्यावर झाला. त्यामुळे सामाजिक चळवळीसाठी लेखकांनी स्वतंत्र वेळ द्यायला हवा, असे मत डॉ. मुलाटे यांनी व्यक्त केले. आंबेडकरी कार्यकर्त्यांनी स्वत:ची माध्यमे निर्माण करण्याऐवजी प्रस्थापित मूल्यवादक संस्था, माध्यमांमध्ये आपले स्थान निर्माण करायला हवे. तशी पात्रता तयार करायला हवी. सर्जनशील साहित्याची निर्मिती करताना त्याला कडेकोट चौकट असता कामा नये. आंबेडकरवादाचे वैयक्तिकीकरण न करता तो सर्वसमावेशक ठेवावा, असे प्रतिपादन प्रा. जयदेव डोळे यांनी केले. डॉ. संजय मून यांनी सध्या धम्म चळवळीचे धर्मात रूपांतर न होऊ देण्याचे आव्हान धम्मापुढे उभे असल्याचे सांगितले. मानवतेच्या प्रवासाला निघालेले दलित साहित्य मध्येच अडकून पडल्याचेही ते म्हणाले, तर दलित साहित्यात बदलाची प्रक्रियाच होऊ शकली नसल्याबद्दल प्रा. अविनाश डोळस यांनी खंत व्यक्त केली. दलित साहित्यिकांनी विरोधी भूमिका ऐकून घेऊन, संवाद-चर्चेद्वारे ज्ञानाच्या कक्षा विस्ताराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. रोहित गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले. वामन गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्ही. एन. नाईक शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्यासह गंगाधर अहिरे, जयवंत खडताळे, प्रमोद अहिरे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)