शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

विजेच्या गडगडाटासह मृगनक्षत्राचे आगमन

By admin | Updated: June 11, 2014 01:06 IST

विजेच्या गडगडाटासह मृगनक्षत्राचे आगमन

 

त्र्यंबकेश्वर : विजेच्या चमचमाटात, ढगांच्या गडगडाटांसह आज सायंकाळी ८ वाजता मृगराजाचे आगमन झाले. दोन दिवस उशिराने का होईना; पण मान्सून बरसला. बळीराजाने पेरणीची पूर्ण तयारी केली आहे. काहींनी पेरणीही पूर्ण केली आहे. मात्र प्रतीक्षा होती ती पावसाची.गेल्या २/३ दिवसांपासून त्र्यंबकला सकाळी आकाश मेघाच्छादित असते असे वाटते. पाऊस येईल, मात्र पाऊस येत नव्हता. सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत आभाळ मोकळे होते आणि उन्हाचा तडाखा सुरू होत असतो. सायंकाळी परत ढगाळ वातावरण होत असते. वारा सुटतो पण पाऊस मात्र पडत नव्हता. आज मात्र सायंकाळी ढग भरून आले. वारा सुटला आणि वातावरण शांत झाले. त्यानंतर केवळ अर्ध्या तासाने पुनश्च वारा सुटला आणि वाऱ्याबरोबरच मृगराजा बरसला. वातावरणात गारवा आला. गाफील भाविकांची तारांबळ उडाली. पळापळ झाली. काही जण तर चिंब भिजले. तरीही पहिल्या पावसाची मजा घेत शांतपणे चालत होती. दिवसभर ऊन आणि उष्म्याने घायाळ झालेल्यांना मात्र पावसामुळे दिलासा मिळाला.तालुक्यासह शहरातील बळीराजा सुखावला आहे. आता शेतीच्या कामाला वेग येईल. पेरण्या, बी-बियाणे खरेदी, ग्रामीण भागात चार महिन्यांची बेगमी केली जाईल. खते खरेदी जोरात सुरू आहे. खरीप हंगामासाठी लागवड खर्चासाठी काही जण सहकार संस्था, सहकारी बँकांचे उंबरठे झिजविण्यास यापूर्वीच प्रारंभ झाला आहे. मालेगाव : शहरासह तालुक्यात विजांचा कडकडाटासह झालेल्या वादळी पावसात मोठे नुकसान झाले. शहरातील असंख्य झाडे उन्मळून पडली; विजेचे खांब वाकले; तर तालुक्यात मळगावी समाजमंदिर उद्ध्वस्त झाले. वीज कोसळून नगावला बैल तर पिंपळगावला गाय ठार झाली. टेहरेत दोन जण जखमी झाले. शहरासह परिसरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळामुळे शहरातील मोठमोठी झाडे उन्मळून पडली तर विजेचे खांबही पडल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याने शहरातील काही भागात अंधाराचे साम्राज्य होते.टेहरेत दोन जखमीटेहरे : येथे वादळी पावसामुळे दोन घरे कोसळली; तर सुमारे २० घरांचे पत्रे उडाले. वादळात रेखा सीताराम शेवाळे आणि अमोल सीताराम शेवाळे हे दोघे जखमी झाले. त्यांचेवर मालेगावी खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. टेहरे शिवारातील शेकडो वृक्ष उन्मळून पडल्याने वाहतूक खोळंबली. विजेचे खांबही पडल्याने गावात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सरपंच दत्तात्रय पाटील व माजी सरपंच अरुण पाटील यांनी जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. पावसामुळे साठवलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले; तर डाळिंबाच्या बागाही वादळामुळे उद्ध्वस्त झाल्या.अजंग-वडेलला वादळी पाऊसवडेल : मालेगाव तालुक्यातील अजंग-वडेल परिसरात सायंकाळी विजांचा कडकडाटासह तुफान वादळी पाऊस झाला. यात विजेच्या तारा तुटल्या; तर विजेचे खांब पडले. अजंग येथे झाडाच्या फांद्या अंगावर कोसळल्याने दुचाकीस्वार दबला. ग्रामस्थांनी त्याच्या अंगावरुन फांद्या काढल्या. घरांसह दुकानांचेही पत्रे वादळात उडाल्याने ग्रामस्थांचे मोठे नुकसान झाले.बैल-गायीचा मृत्यूतालुक्यातील नगाव दिगर येथे वीज कोसळून बैल ठार झाला तर पिंपळगाव दाभाडी येथे वीज कोसळून शेतकऱ्याची गाय दगावली.मळगावी समाजमंदिर उद्ध्वस्तमळगाव : तालुक्यातील मळगाव नागुजीचे येथे विजांच्या कडकडाटसह झालेल्या वादळी पावसात गावातील समाजमंदिर उद्ध्वस्त झाले तर युवराज उशीरे यांची गाय पत्र्याच्या शेडखाली दबल्याने मरण पावली. मळगावी झाडे उन्मळून पडली तर घरांचे पत्रे उडाले. शेतकऱ्यांच्या कांदा चाळीचेही मोठे नुकसान झाले.