शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरातील बाजारात द्राक्षांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:23 IST

नाशिक : गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच ...

नाशिक : गेल्या वर्षी अवकाळी पाऊस आणि कोरोनामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु, यावर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच स्थानिक बाजारपेठेत द्राक्षांचे आगमन झाले असून द्राक्षांना मागणी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांनाही हा हंगाम अधिक उत्पन्न मिळवून देण्याची अपेक्षा आहे. सध्या बाजारात द्राक्षाला प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. मात्र, थंडीमुळे अद्याप द्राक्षांमध्ये पुरेशी साखरभरणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे पुढील काळात वाढत्या उष्णतेसोबतच द्राक्षांच्या साखरेत आणि भावातही वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्यात नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर आणि अहमदनगर जिल्हे द्राक्ष उत्पादनाचे मुख्य जिल्हे आहेत. त्यातही नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांची सर्वाधिक निर्यात युरोपियन देशांमध्ये होते. मात्र, दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अतिपावसाचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर झाला होता. तर २०२० मध्ये अवकाळी पावसाचा द्राक्षांना फटका बसला होता. अशा कठिण परिस्थितीचा सामना केल्यानंतर यावर्षी द्राक्षांना युरोपसह विदेशात चांगली मागणी असताना स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षांना चांगला दर मिळत आहे. सध्या बाजारपेठेत प्रतवारीनुसार ५० ते ७० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. पुढील काही दिवसांत निर्यातीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्याने स्थानिक बाजारपेठेतही द्राक्षांचे भाव वाढण्याची शक्यता विक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

थंडीमुळे अद्याप द्राक्षांमध्ये पुरेशी साखरभरणी होऊ शकलेली नाही. फेब्रुवारी अखेरपर्यंत साखरभरणी होऊन निर्यातीलाही चांगला प्रतिसाद मिळेल. त्यामुळे पुढील काळात द्राक्षांना चांगले दर मिळण्याची आशा आहे.

-मदन पिंगळे , द्राक्ष उत्पादक शेतकरी

इन्फो -

आरोग्यासाठी द्राक्षे फायदेशीर

द्राक्षे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहेत. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर असून ते शरीराला बर्‍याच प्रकारे फायदा देतात. आयुर्वेदात द्राक्षाला आरोग्याचा खजिना म्हणून वर्णन केले गेले जाते.

(फोटो- ०२पीएचएफबी८४, ८५, ८६)