शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

मूर्तिजापूर येथे अटक : पाच लाखांच्या खंडणीची मागणी

By admin | Updated: October 2, 2016 00:57 IST

विंचूर येथील ठेकेदाराच्या अपहृत बालकाची सुटका

विंचूर/नाशिक : ठेकेदाराकडे कामास असलेल्या परप्रांतीय मजुराने केलेल्या पैशांच्या अफरातफरीबाबत मालक पोलिसांत गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मिळताच मजुराने ठेकेदाराच्या अडीच वर्षीय बालकाचे अपहरण करून खंडणीची मागणी केल्याची घटना निफाड तालुक्यातील विंचूर येथे घडली. विशेष म्हणजे या अपहरण प्रकरणाची तक्रार ठेकेदाराने शहर पोलिसांकडे करताच शहर पोलीस, तांत्रिक विश्लेषण विभाग, ग्रामीण पोलीस व रेल्वे पोलीस यांनी संयुक्त मोहीम राबवून शनिवारी (दि़ १) पहाटे मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर या अपहृत बालकाची सुखरूप सुटका तर केलीच शिवाय या मजुराच्या मुसक्याही आवळल्या़सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी दिलेल्या माहितीनुसार निफाड तालुक्यातील विंचूर येथे शासकीय ठेकेदार शेख इसाक शेख इमाम राहतात़ त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील मालदा येथील संशयित जिया उल हक हा गत आठ वर्षांपासून कामास होता़ जुना कामगार असल्याने ठेकेदार शेख यांनी विश्वासाने त्याच्याकडे बिलांसह आर्थिक जबाबदारी सोपविली होती़ मात्र, गत काही दिवसांपासून तो बिलांमध्ये अफरातफर करून जास्तीची बिले लावून पैसे काढत असल्याचे शेख यांच्या लक्षात आले़ त्यांनी हे काम काढून घेतले व पोलिसांत तक्रार करण्याचीही धमकी दिल्याने या दोघांमध्ये वादही झाले होते़ठेकेदार इसाक हे शुक्रवारी (दि़ ३०) कामानिमित्त मुंबईला गेले होते़ ही संधी साधून संशयित जिया उल हक हा दुपारच्या सुमारास त्यांच्या घरी गेला व त्यांचा अडीच वर्षीय मुलगा शेख आफताब शेख इमाम यास फिरवून आणण्याचे बहाण्याने घेऊन गेला़ त्यांच्या पत्नीस या दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती नव्हती, तसेच तीन-चार तास होऊनही आफताब व जिया घरी न आल्याने त्यांनी जियाच्या घरी जाऊन पाहिले असता तो सामानासह गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी लगेच पतीशी संपर्क करून घटनेची माहिती दिली़ या प्रकारानंतर घाबरलेले इसाक यांनी जियाला फोन केला असता त्याने आपल्या बॅँक खात्यामध्ये पाच लाख रुपये टाकण्यास सांगितले, पैसे न टाकल्यास आफताबला ठार मारण्याची धमकीही दिली़ मुंबईहून नाशिकला रात्री १० वाजेच्या सुमारास येताच इसाक यांनी तडक सरकारवाडा पोलीस ठाणे गाठूननिरीक्षक कोल्हे यांच्याकडे तक्रार केली़ कोल्हे यांनी शहर-ग्रामीण असा भेदभाव न करता तत्परतेने सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल पवार, ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, लासलगावचे पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना माहिती देऊन कामास सुरुवात केली़ सायबर शाखेकडून जियाचे मोबाइल लोकेशन घेतल्यानंतर तो अपहृत बालक आफताब यास घेऊन रेल्वेने प्रवास करीत असल्याचे समोर आले़ रेल्वे पोलिसांनाही या कामगिरीमध्ये समाविष्ट करून घेतले व अखेर शनिवारी (दि़ १) पहाटे ३:४५ वाजेच्या सुमारास मूर्तिजापूर रेल्वेस्थानकावर जियाला अटक करून आफताबची सुखरूप सुटका करण्यात आली़ त्याच्यावर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.