शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

सेना, भाजपकडून उमेदवार निश्चित

By admin | Updated: June 9, 2014 00:19 IST

पोट निवडणूक : हालचालींना वेग; मनसे, कॉँग्रेसमध्ये शांतता

 

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ आणि ६१ या दोन प्रभागातील रिक्त जागांसाठी उमेदवारांची चाचपणी अंतिम टप्प्यात असून, सोमवारी दोन्ही प्रभागाच्या इच्छुकांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रभाग क्रमांक १७ मधून भाजपाकडून दिनकर पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे, तर प्रभाग ६१ मधून केशव पोरजे यांच्या नावावर एकमत झाल्याचे सूत्रांकडून समजते. प्रभाग क्रमांक १७ मधील कॉँग्रेसचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी बहुजन समाज पार्टीत प्रवेश केला होता; तर प्रभाग ६१ चे मनसेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांनी भगवा हाती घेत शिवसेनेत प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली. त्यामुळे या दोघाही नगरसेवकांनी राजीनामा दिल्यामुळे या पोटनिवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेच्या वतीने नाशिकरोड तसेच नाशिकमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. नाशिकरोडमधील प्रभाग क्रमांक ६१ च्या जागेसाठी शिवसेनेकडून अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यामध्ये केशव पोरजे, शिवनाथ हांडोरे, प्रभाकर पाळदे, महेंद्र पोरजे, धनंजय पाटील आणि विश्वास हांडोरे यांनी दावा सांगितला. उमेदवारीबाबत इच्छुकांमध्येच एकमत व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात आले; मात्र कुणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने आमदार बबनराव घोलप आणि खासदार हेमंत गोडसे यांच्यावर अंतिम निर्णय सोपविण्यात आला. काही वेळेतच पोरजे यांच्या नावावर एकमत झाल्याची चर्चा पसरली. अधिकृत घोषणा अद्यापही करण्यात आलेली नाही. सातपूर येथील प्रभाग १७ मधील जागा दिनकर पाटील हेच लढवतील, अशीच एकूण परिस्थिती आहे. पाटील यांचा भाजपाप्रवेश झाल्यानंतर त्यांच्या नावाची उद्या औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. इतर पक्षांकडून अद्याप कोणतीही चाचपणी करण्यात आली नसली तरी त्यांची भूमिका वेट अ‍ॅण्ड वॉचची असल्याचे दिसून येते. येथील जागेसाठी माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी उमेदवारी अर्ज नेला आहे; मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून कुणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही. इतर आणखी दोन-तीन इच्छुकांनी अर्ज नेले आहेत. इकडे कॉँग्रेसकडून अजून तरी कुणीही येथील जागेवर लढण्याची तयारी दर्शविलेली नाही. मात्र सेनेकडून साहेबराव जाधव आणि चंदा उफाडे यांनी इच्छुक म्हणून मुलाखत दिलेली आहे. यापूर्वी या दोघांनी निवडणूक लढविली आहे.येत्या मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने सर्वांचे लक्ष उमेदवारी अर्जावर लागले आहे. (प्रतिनिधी)