शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
9
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
10
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
11
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
12
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
13
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

कॅशलेस व्यवस्थेमुळे वनविभाग अडचणीत

By admin | Updated: January 16, 2017 01:29 IST

वनअधिकाऱ्यांपुढे पेच : पारंपरिक व्यवहारातील ‘अ‍ॅडव्हान्स’ पद्धत बंद पडणार

 नाशिक : वृक्षसंवर्धन आणि वनरक्षण करण्यासाठी वनविभाग ज्या मजुरांच्या भरवशावर निवांत आहे, त्या मजुरांना मोदी सरकारच्या कॅशलेस व्यवस्थेचा फटका बसल्याने शासनाचाच वनविभाग अडचणीत आला आहे. केवळ विश्वासाच्या भरवशावर उभा राहिलेला वनअधिकारी आणि वनमजूर यांच्यातील ‘अ‍ॅडव्हान्स’चा आर्थिक व्यवहार करणे आता अधिकाऱ्यांना धोक्याचा वाटू लागला आहे. त्यामुळे त्यांनी मजुरांना खिशातून अ‍ॅडव्हान्स देणे बंद केल्याने मजुरांकडूनही कामाला नकार मिळू लागला आहे. सामाजिक वनीकरण आणि वनविभागात वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड ही महत्त्वाची कामे आहेत. वनरक्षणाचे काम वर्षभरासाठीचे असते तर वृक्षलागवडीसाठी जुलैपासून पुढे कामकाज केले जाते. याबरोबरच पाणी अडवा, पाणी जिरवा, वनतळे यांची देखरेख याबाबतची कामे वनमजुरांमार्फत केली जातात. स्थानिक मजूर असल्याने वनसंपत्ती जतन करण्यासाठी या मजुरांची मदत घेतली जाते. परंतु आता या वनमजुरांना काम देणे शासनाच्याच कॅशलेस भूमिकेमुळे अवघड होऊन बसले आहे. मजुरांना तत्काळ पैसे मिळणे अपेक्षित असते. परंतु शासनाकडून कामांना मंजुरी, मजुरीचे दर तसेच प्रत्यक्ष पैसे मिळेपर्यंत बराच वेळ लागतो. अशावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वत:च्या खिशातून मजुरांना अ‍ॅडव्हान्स देतात.