शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

वीज वितरणची मनमानी : आठ तासांत होतो ८० वेळा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:17 IST

वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकºयांचा रब्बी हंगाम पाणी असूनही करपू लागला आहे. आठ तासांच्या वीजपुरवठ्यात ऐंशी वेळा खंडित होणाºया वीजपुरवठ्याला नायगाव खोºयातील शेतकरी वैतागले आहेत. शेकडो एकर कांदा लागवड पाण्या अभावी करपल्याने शेतकºयांचा संताप वाढला आहे.

नायगाव : वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे शेतकºयांचा रब्बी हंगाम पाणी असूनही करपू लागला आहे. आठ तासांच्या वीजपुरवठ्यात ऐंशी वेळा खंडित होणाºया वीजपुरवठ्याला नायगाव खोºयातील शेतकरी वैतागले आहेत. शेकडो एकर कांदा लागवड पाण्या अभावी करपल्याने शेतकºयांचा संताप वाढला आहे.सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड व गव्हाच्या पेरणीचे काम सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून नायगाव व परिसरात विशेषत: जायगाव व देशवंडी गावांमध्ये वीज वितरणाचे तीन तेरा वाजल्याने शेतकरी वर्गात कंपनीच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिसरात सध्या उन्हाळ कांद्याची लागवड सुरु आहे. देशवंडी व जायगाव शिवारात गेल्या दोन दिवसांपासुन शेतीसाठी आठ तास होणाºया वीज पुरवठ्यात सकाळी साडेआठ वाजेपासून दुपारी साडेचार वाजेपर्यंत पंधरा मिनिटांच्या अंतरावर वारंवार खंडित होणाºया वीजपुरवठ्यामुळे शेतात सुरु असलेल्या कांदा लागवड केलेल्या पिकास विहिरीत पाणी असूनही देता येत नसल्याने गेल्या दोन दिवसांमध्ये शेकडो एकर लागवड केलेला कांदा उन्हाच्या तीव्रतेने करपून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. शासन शेतकºयांना थकीत बिल भरण्यासाठी कृषी संजिवनी योजना जाहीर करु न शेतकºयांकडून बिलाची रक्कम वसुली करत आहे.मात्र शेतीसाठी अखंडीत वीज देण्यासाठी कोणतेच पाऊल उचलत नसल्याचे शेतकरी सांगत आहे.सध्या पाणी भरतांना वाफ्यात पाणी आले की वीज गायब होत असल्याने पाणी भरणा-या शेतकºयांची तारांबळ होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आज सकाळपासून विजेचा खेळखंडोबा जास्तच वाढल्याने पाण्यावाचून कांदा करपू लागल्याने दोन्ही गावचे शेतकरी जायगाव येथे एकत्र येत वीज वितरणचे अधिकारी राजेंद्र महाजन यांना बोलावुन वारंवार खंडीत होणाºया वीजेच्या समस्या सोडवण्याची मागणी केली.यावेळी महाजन यांनी दोन दिवसात ही समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.