शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

वस्त्रांतरगृह : पालकमंत्र्यांचे घुमजाव

By admin | Updated: January 16, 2015 23:26 IST

संदिग्धता कायम : प्रत्यक्ष पाहणी करून घेणार निर्णय

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींच्या मागणीवरून रामकुंडानजीकचे वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश देणारे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी घुमजाव केले असून, सदरची वास्तु मोठी व धार्मिक कारणांसाठी वापरली जात असल्याचे सांगण्यात आल्याने ती पाडण्याबाबत अगोदर पाहणी केली जाईल व मगच निर्णय घेतला जाईल, असे सांगून याबाबतची संदिग्धता कायम ठेवली आहे. गेल्या आठवड्यात साधु-महंतांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार देवयानी फरांदे यांनी हा विषय उपस्थित केला असता, महंत ग्यानदास यांनी वस्त्रांतरगृहाच्या इमारतीमुळे शाहीस्नानासाठी साधुंना अडथळा निर्माण होत असल्याचे सांगितले होते. या वस्त्रांतरगृहामुळे आपण पाण्यात बुडता बुडता वाचलो अशी पृष्टी जोडून त्यांनीही वस्त्रांतरगृह तत्काळ काढून टाका अशी सूचना केली, तर फरांदे यांनी वस्त्रांतरगृहामुळे रामकुंडावर सूर्यप्रकाश पडत नाही त्याचबरोबर गोदावरी मंदिराला प्रदक्षिणा घालण्यातही अडचणी येत असल्याचे सांगितले होते. या सूचनांचा आधार घेत पालकमंत्री महाजन यांनी वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याचे आदेश महापालिका व जिल्हा प्रशासनाला दिले होते. या बैठकीनंतर दुसऱ्याच दिवशी रामकुंडावर धार्मिक विधी करणाऱ्या पुरोहित संघाने वस्त्रांतरगृह पाडण्यास विरोध दर्शवून महंत ग्यानदास यांची भेट घेतली व त्यांची मनधरणी केली, तर पालकमंत्री महाजन यांच्याकडेही विरोध प्रकट केला होता. वस्त्रांतरगृहाबाबत परस्परविरोधी भूमिका सुरू झाल्याने महाजन यांनी आमदार बाळासाहेब सानप यांना संबंधितांशी चर्चा करण्याची सूचना केली होती. शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन यांनी वस्त्रांतरगृहाची वास्तू ही शासनाच्या निधीतून उभारण्यात आली असून, ती बरीच मोठी असल्याचे आपल्याला सांगण्यात आले. या वास्तुचा उपयोग धार्मिक विधींसाठी केला जात असल्याचेही लक्षात आणून देण्यात आले. वस्त्रांतरगृह पाडून टाकण्याच्या सूचना आपण केल्या असल्या तरी, त्यावेळी ही वास्तु इतकी मोठी व शासननिर्मित असेल याची कल्पना नव्हती. आता मात्र आपण स्वत:च या वास्तुला भेट देऊन त्याची उपलब्धता व गरज तपासून पाहणार असून, त्यानंतरच ती पाडायची की, राहू द्यायची याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी बदललेल्या या भूमिकेमुळे वस्त्रांतरगृहाला अभय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)