शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

‘एक’ अधिकारी अखेर रजेवर बेकायदेशीर अधिकारी नियुक्ती प्रकरण

By admin | Updated: December 12, 2014 01:44 IST

‘एक’ अधिकारी अखेर रजेवर बेकायदेशीर अधिकारी नियुक्ती प्रकरण

  नाशिक : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील वादाच्या भोवऱ्यात सापडलेले दोघा अधिकाऱ्यांपैकी एक अधिकारी अचानक रजेवर गेल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. तसेच दुसऱ्या अधिकाऱ्यालाही प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीबाबत विचारणा केल्याचे समजते. विशेष म्हणजे यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या दोन विद्यमान पदाधिकाऱ्यांनीही जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला माहिती मागवून कोंडीत पकडण्याची खेळी केल्यानेच या दोघांपैकी एक अधिकारी कालपासून अचानक रजेवर गेल्याचे कळते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयातील १४ कर्मचाऱ्यांनी लेखी तक्रार करून वरीष्ठ अधिकाऱ्याच्या मानसिक छळामुळे मनस्ताप होत असल्याचे कळविले होते. त्यातच एका विद्यमान महिला पदाधिकाऱ्याच्या पतीराजाने तक्रार असलेल्या अधिकाऱ्याचीच मुळात नियुक्ती कायदेशीर नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे. दुसरीकडे १४ कर्मचाऱ्यांच्या लेखी तक्रारीची दखल घेऊन संबंधित सहाय्यक प्रकल्प अधिकाऱ्याकडून प्रशासनाने खुलासा मागविल्याचे कळते. गेल्या काही वर्षापासून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात हेच दोन्ही अधिकारी सर्वेसर्वो झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या लोकप्रतिनिधींनी केलेली असतानाच आता कर्मचाऱ्यांनही बंड पुकारल्याने जिल्हा परिषद प्रशासन अडचणीत आले आहे. विशेष म्हणजे काही वर्षापूर्वीच या विभागातील काही संगणक व साहित्य चोरीस गेले होते. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे. चोरीस गेलेल्या संगणकात अपहार व भ्रष्टाचाराची प्रकरणे व माहिती असल्यानेच रातोरात हे संगणक चोरीस गेल्याने बराच गदारोळ झाला. मात्र याप्रकरणाची चौकशीही नेहमीप्रमाणे बासनात गुंडाळण्यात आल्याचे समजते. (प्रतिनिधी)