शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

वाघ खून प्रकरणातील संशयितांचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: December 22, 2016 00:17 IST

वाघ खून प्रकरणातील संशयितांचा अर्ज फेटाळला

नाशिक : हनुमानवाडी कॉर्नरवरील भेळभत्ता विक्रेता सुनील वाघ खून प्रकरणात मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले संशयित श्रीनिवास कानडे, पवन कातकाडे व अजय बागुल या तिघांचाही जामीन अर्ज जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांच्या प्रभावी युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला फलके - जोशी यांनी बुधवारी (दि़२१) फेटाळला़ २७ मे २०१६ रोजी हनुमानवाडी परिसरात कुविख्यात परदेशी टोळीने वाघ याचा खून केल्याची घटना घडली होती़ दरम्यान, या खटल्यातील फिर्यादींनी प्रधान जिल्हा न्यायाधीशांकडे केलेल्या विनंतीनुसार या खटल्याची सुनावणी जोशी यांच्याच न्यायालयात होणार आहे़पोलिसांनी परदेशी टोळीवर मोक्कान्वये कारवाई केली, मात्र पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांनी परवानगी नाकारल्याने मोक्का हटला़ यामुळे संशयित कानडे, कातकाडे व बागुल यांनी जामिनासाठी अर्ज केला होता़ जिल्हा सरकारी वकील मिसर यांनी न्यायालयात युक्तिवादात सांगितले की, संशयित पवन कातकाडे याचे फिर्यादीत नाव नसले तरी खून केल्याची त्यास माहिती होती़ तसेच त्याने खोटे सांगून संशयितांना लपून राहण्यासाठी फ्लॅट उपलब्ध करून दिला व याच घरातून पोलिसांनी आरोपींचे रक्ताळलेले कपडे जप्त केले़ अजय बागुलचा प्रत्यक्ष खुनात सहभाग नसल्याबाबत मिसर यांनी सांगितले की, सराईत गुन्हेगार कुंदन परदेशी व बागुल एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे आहेत़ तसेच वाघचा खून होण्यापूर्वी न घाबरण्याचा सल्लाही दिला होता़ तसेच खुनाच्या घटनेनंतर संशयितांना आर्थिक मदतीबरोबरच कातकाडे याच्या संपर्कातही होता़ परिसरात लावण्यात आलेले प्रेरणास्थानचे फलक, गुन्ह्यास चिथावणी व मदत केल्याचे पुरावे असल्याचे सांगितले़ तर वाघच्या खुनानंतर श्रीनिवास कानडे यास आरोपींनी कारमधून पळवून नेत असताना अटक करण्यात आली होती़