शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
2
'दादा, ओला दुष्काळ जाहीर करा'; अजित पवार शेतकऱ्यांना म्हणाले, "आता आम्हाला पाहणी तर..."
3
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
4
ECINET: मतदार यादीतून नाव काढणं आता सोपं नाही; निवडणूक आयोगानं सुरू केली नवी 'ई-साइन' प्रणाली
5
पाकिस्तान युद्धात सैनिक लढला होता, नंतर पेन्शनशिवाय काढून टाकले; पत्नीला ५७ वर्षांनंतर मिळाला न्याय
6
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
7
Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु!
8
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
9
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
10
एकाच वेळी पाच-सहा मराठी सिनेमे रिलीज, कसं व्हायचं? प्रसिद्ध गायकाने मांडलं मत, इंडस्ट्रीबद्दल म्हणाला...
11
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
12
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
13
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
14
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
15
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
16
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
17
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
18
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
19
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
20
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले

‘मेट’ची जागा परत घेण्याचे अपील फेटाळले

By admin | Updated: October 1, 2016 01:48 IST

सर्वोच्च न्यायालय : छगन भुजबळ यांना दिलासा

नाशिक : छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला (मेट) नाशिक तालुक्यातील गोवर्धन येथील दिलेली गायरान जमीन शासन जमा करण्यास मज्जाव करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेल्या राज्य सरकारचे अपील फेटाळून भुजबळ यांना दिलासा दिला आहे. गेल्या आठवड्यातच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. गोवर्धन शिवारातील ४.१३ हेक्टर जागा सन २००३ मध्ये राज्य शासनाने छगन भुजबळ यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला शासकीय दरात दिली होती. ही जागा देताना ज्या कारणासाठी ती देण्यात आली त्या कारणासाठीच व विशिष्ट मुदतीतच त्या जमिनीचा वापर केला जावा अशा अटी, शर्ती घालून देण्यात आल्या होत्या, परंतु भुजबळ यांनी या अटी, शर्तींचे पालन केले नसल्याची बाब पुढे करून राज्यात दोन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या सरकारने मुंबई एज्युकेशन ट्रस्टला नोटीस बजावून खुलासा मागविला होता. दरम्यान, भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे विविध आरोप होऊन ते गर्तेत सापडलेले असताना गोवर्धन येथील जमिनीचेही प्रकरण उकरून काढण्यात येऊन सदरची जमीन शासन जमा करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाने केली होती. प्रशासनाच्या या कारवाईविरुद्ध तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे भुजबळ यांच्या वतीने अपील करण्यात आले व त्याची सुनावणी होऊन भुजबळांचे अपील फेटाळून मोठा झटका देण्यात आला होता. महसूलमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांनी धाव घेत, या कारवाईला स्थगिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता, त्याची सुनावणी न्यायमूर्ती गुप्ते यांच्यासमोर झाली होती, त्यावर न्यायालयाने भुजबळ यांच्या मेटला बहाल करण्यात आलेल्या (पान ९ वर)जागेचा ताबा घेण्याची राज्य सरकारची कारवाई रद्द ठरविली. मुंबई उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध गेल्याच आठवड्यात जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन अपील दाखल केले होते. त्यात शैक्षणिक संस्थेसाठी शासकीय जमीन घेतल्यानंतर मेट ने अटी, शर्तींचा भंग केल्याचे म्हटले होते. मात्र उच्च न्यायालयाचा आदेश होऊनही नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जागा ताब्यात दिली नसल्याने न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याची तक्रार भुजबळ यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारचे अपील सुनावणीसाठी पुढे आल्यावर न्यायालयाने ते फेटाळून लावले.