शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

बुद्धिदाता गणरायाला वही आणि पेन अर्पण करण्याचे अंनिसचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 20:50 IST

चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत.

नाशिक : चैतन्याचा उत्सव असलेल्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांकडे जातांना पेढे, हार, फुले आणले जातात. ते वापरलेही जात नाहीत. अशा स्थितीत परिवर्तनाची चळवळ म्हणून नागरिकांनी फुले, पेढे नेण्याऐवजी बुद्धिदात्याला एक वही आणि पेन अर्पण केले, तर गरजवंत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास मदत होऊ शकेल! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने हे आवाहन केले असून, या नव्या चळवळीचा प्रारंभच नाशकातून करण्यात आला आहे.गणराय हा श्रद्धेचा भाग असल्याने त्याला महाराष्ट अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कधीही विरोध केला नाही. मात्र तो परिवर्तनवादी व्हावा आणि लोकमान्य टिळकांनी ज्या वैचारिक प्रबोधनासाठी हा उत्सव सुरू केला, त्याचे खºया अर्थाने स्मरण व्हावे, अशी समितीची अपेक्षा आहे. बदलत्या काळात उत्सव बदलले पाहिजेत, या उद्देशाने १९९७ मध्ये चळवळीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला. त्यानुसार गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी परिसरातील नदीपात्रात जाणारे निर्माल्य बाजूला काढतानाच विसर्जित गणेशमूर्ती दान करण्याची चळवळ सुरू केली. आता ही लोकचळवळ झाली असून, त्यामुळेच आता पुढील टप्पा म्हणून बुद्धिदाता गणरायाला वही आणि पेन अर्पण करण्याचे आवाहन करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा शाखेचे कार्यवाह महेंद्र दातरंगे यांनी दिली.