शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

पावसाची ओढ अन‌् दाटले चिंतेचे ढग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:11 IST

यंदा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक मान्सूनचा वर्षाव होईल, असा मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेल्यानंतर, सर्वांनाच तात्पुरता का होईना दिलासा ...

यंदा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक मान्सूनचा वर्षाव होईल, असा मान्सूनपूर्व अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला गेल्यानंतर, सर्वांनाच तात्पुरता का होईना दिलासा मिळाला. मान्सूनचे राज्यात वेळेवर आगमन झाले अन‌् शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. शहरासह जिल्ह्यात ५ जून रोजी पावसाने जोरदार सलामी दिली. यामुळे यंदा हवामान खात्याचा अंदाज पूर्णत; खरा ठरणार असल्याचे चित्र दिसत होते, तसेच मान्सूनपूर्व सरीही दमदार बरसल्याने शेतकऱ्यांकडून मशागतीच्या हालचाली गतिमान करण्यात आल्या. खरिपाच्या पेरणीचाही बहुतांश ठिकाणी बळीराजाने ‘श्रीगणेशा’ केला. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारली.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ हे तीन तालुके वगळता, अन्य तालुक्यांमध्ये फारसे समाधानकारक पर्जन्यमान अद्याप तरी राहिलेले आकडेवारीवरून दिसत नाही. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक कमी केवळ १० मिमी इतका पाऊस येवला आणि नांदगाव तालुक्यात नोंदविला गेला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ५३८ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. शहरात आतापर्यंत या हंगामात केवळ १०१.१ मिमी इतका पाऊस पडला आहे, तसेच जिल्ह्यात १ हजार ७३१ मिमी इतका पाऊस पडला आहे. शहरात १ जून रोजी २३ तर १९ जून रोजी सर्वाधिक २७.३ मिमीपर्यंत इतका पाऊस पडला होता.

पावसाने अचानकपणे विश्रांती घेतल्यामुळे सर्वदूर चिंतेचे ढग दाटले असून, बळीराजासह सर्वांनीच आकाशाकडे नजरा लावल्या आहेत. मात्र, मान्सूनला अनुकूल अशी स्थिती अद्यापही राज्यात निर्माण होत नसल्याने पावसाचे ढग दाटणार तरी कधी, असाच प्रश्न सर्वांना पडला आहे.