शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
6
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
7
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
8
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
9
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
10
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
11
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
12
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
13
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
14
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
15
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
16
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
17
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
18
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
19
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
20
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षविरोधी कारवाया; भाजपा नेत्यांवर कारवाई

By admin | Updated: February 25, 2017 01:08 IST

गिरीश महाजन : नवनिर्वाचितांच्या सत्कार सोहळ्यात इशारा

नाशिक : महापालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशापेक्षा अधिक भव्य यश म्हणजे ८० हून अधिक जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु पक्षातच उणिवा राहिल्या. पक्षाच्या चारही उमेदवारांसाठी चार मते मागण्याऐवजी एकच मत मागण्यात आले. तसेच काही पदाधिकाऱ्यांनीच पक्षविरोधी काम केले. त्यांच्या चुका लक्षात आल्या असून, पुरावेही मिळाले आहेत, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपाचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. इतकेच नव्हे तर असे नेते आणि पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही महाजन यांनी दिले आहेत.निवडणुकीच्या भाजपाला १२२ पैकी ६६ जागा मिळाल्याने स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी त्यातही पक्षांतर्गत कंगोरे आहे. राजी-नाराजीतून झालेल्या बंडखोऱ्या आणि पक्षविरोधी कारवाया यांना आता तोंड फुटू लागले आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनीच जाहीर कार्यक्रमात हा विषय मांडला आहे. वसंत स्मृती येथे भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार शुक्रवारी करण्यात आला. यावेळी महाजन बोलत होते. व्यासपीठावर पर्यटनमंत्री जयकुमार रावल, संघटनमंत्री किशोर काळकर, पक्षाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. अपूर्व हिरे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पक्षांतर्गत विरोधकांचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडेनिवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेक जण नाराज झाले. पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद ज्यांनी माघार घेतली त्या कार्यकर्त्यांचा निश्चितपणे सन्मान केला जाईल, असे सांगताना पक्षाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीत पक्षाच्याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपाच्या उमेदवारांच्या विरोधात बंडखोरी करायला भाग पाडले, असा आरोप करीत याबाबतचा सविस्तर अहवाल आपण मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याचे सांगून शहराध्यक्ष सानप यांनी धक्का दिला. मागील पंचवार्षिक निवडणुकीत पक्षाच्या गटनेत्याचे न ऐकणाऱ्यांचा हिशेब चुकता केला आहे, असे जाहीररीत्या सांगणाऱ्या सानप यांनी पक्षामुळे आपण निवडून आलो आहोत, त्यामुळे पक्षादेशानुसार काम करा, कोणाच्या हातचे बाहुले बनू नका, असा सल्लाही दिला.गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीत अनेकांनी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी उपलब्ध जागा पाहता सर्वांना संधी देणे शक्य नव्हते. मात्र, निवडून येण्याच्या क्षमतेच्या निकषावर उमेदवारी देण्यात आल्या होत्या. त्यापेक्षा अधिक जागा मिळाल्या असत्या,  परंतु पक्षातील काहींच्या चुका पक्षाच्या पराभवाला कारणीभूत ठरल्या. या सर्व गोष्टींचे विश्लेषण यथावकाश केले जाईल, असेही ते म्हणाले. निवडणुकीत यश मिळाले म्हणजे काम झाले असे नाही, तर लोकांच्या सुख-दु:खात सहभागी व्हावे, या कामगिरीवरच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मतदार मूल्यांकन करतील,  असेही ते म्हणाले. यावेळी रावल यांनी मनपाबरोबरच ग्रामीण भागात म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, सुनील बागुल, चिटणीस लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव उपस्थित होते. सूत्रसंचालन नाना शिलेदार यांनी केले.