शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

येवला महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:14 IST

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले.

येवला : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोबाइलचा बळी न होता साहित्याला आपला भाव विषय बनवून त्यातून जीवनमूल्य घ्यावेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. गो. तु. पाटील यांनी केले.येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध कवी तुकाराम धांडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, उपप्राचार्य प्रा. शिवाजी गायकवाड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुशील गुजराथी, अ‍ॅड. माणिकराव शिंदे, सुरेश सानप व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी तुकाराम धांडे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत निसर्गाच्या कविता सादर केल्या. तसेच कवितेच्या निर्मितीसंदर्भात अनुभव कथन केले. प्रा. डॉ. जी.जे. भामरे व प्रा. डी.के. कन्नोर यांनी सूत्रसंचालन केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. के. के. बच्छाव यांनी करून दिला, तर डॉ. मनीषा गायकवाड यांनी आभार मानले. याप्रसंगी लेखापाल अजय सोमानी यांच्याकडून वाणिज्य शाखेतील वैष्णवी मारवाडी या प्रथम आलेल्या विद्यार्थिनीस रुपये एक हजार रोख व प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे यांचे वडील कै. विठ्ठलराव गमे यांच्या स्मरणार्थ कैलास गायकवाड यास मराठी विषयात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच क्रीडा विभागातील राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडू प्रतीक्षा बिल्लाडे, कांचन जोशी, यशवंती गुप्ता, पूजा काळे, रोहन लोणारी, रोहन परदेशी व दर्शन ताठे यांचाही गौरव करण्यात आला. प्रा. शारदा अहिरे, राजेंद्र सौंदाणे आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक