शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
2
चीनच्या माजी मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून अब्जावधी रुपये कमावले, आता न्यायालयाने दिली मृत्युदंडाची शिक्षा
3
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; Gold पुन्हा ऑल टाइम हायवर, चांदी २००० रुपयांनी वधारली
4
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावले; "तुम्ही किती किट आणले..."
5
दिवाळीला बायकोला द्या स्कूटर गिफ्ट! ८०,००० रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये मिळतायेत बेस्ट पर्याय
6
शेतकरी संकटात, पुरामुळे संसार उद्ध्वस्त; विशेष अधिवेशन बोलवा, विरोधकांचं राज्यपालांना पत्र
7
बिहारमध्ये नीतीश कुमारांच्या पक्षाला किती जागा मिळणार? तेजस्वी कमाल करणार? भाजपचं काय होणार? नव्या सर्व्हेचा धक्कादायक अंदाज!
8
Chaitanyananda Saraswati : "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती
9
"फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर
10
GST नंतर आता तुमचा EMI स्वस्त होणार? RBI च्या पतधोरण समितीची बैठक आजपासून, रेपो दरात किती कपात
11
एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण...
12
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
13
९ कंपन्यांचे IPO आजपासून झाले खुले, गुंतवणूकीचा विचार करताय का? पाहा GMP सह अन्य डिटेल्स
14
विम्यासाठी भयंकर कट! आधी आई, मग पत्नी, आता वडिलांचा मृत्यू...; पैशांसाठी लेक झाला हैवान
15
दुकाने,रस्ते बंद, इंटरनेटही बंद, लोक रस्त्यावर उतरली; पीओकेमधील जनता पाकिस्तान सरकारवर का नाराज आहेत?
16
Dussehra 2025: आपट्याचे पान देऊन 'सोनं लुटणं' म्हणण्याचा प्रघात कसा रूढ झाला माहितीय?
17
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
18
ऑफ-रोड आणि लक्झरीची बादशाह! अभिषेक शर्माला मिळालेल्या चायनीज SUV कारची ८ खास वैशिष्ट्ये
19
Mumbai Metro 3: भुयारी मेट्रोचे प्रवेशद्वार छताविना; हुतात्मा चौक स्थानकात पाणी शिरण्याचा धोका, एमएमआरसीवर टीकास्त्र
20
Atlanta Electricals Ltd Listing: ₹८५७ वर लिस्ट झाला हा आयपीओ; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना तुफान फायदा, झाले मालामाल

सनातनच्या यादीतील नावे जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:49 IST

नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

ठळक मुद्देजयंत पाटील : विभागीय संविधान बचाव यात्रेत मागणी

नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या विभागीय यात्रेच्या निमित्ताने आयोजित ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमात पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात संवैधानिक मुद्द्यांना हरताळ फासला जात असून, मनुवादी विचारांना सरकारकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे. देश एकसंघ ठेवण्यासाठी ज्या घटनेचा आधार आजवर घेतला गेला, ती घटनाच जाळून टाकण्याचे पाप याच सरकारच्या काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे घटना जाळणाºयांवर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही की त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आलेले नाही याचाच अर्थ मनुस्मृतीकडे पुन्हा एकवार वाटचाल करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाºयांचे आवाज बंद केले जात आहेत. प्रा. कुलबुर्गी, गौरी लंकेश, कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या त्याचेच द्योतक असून, पाच वर्षांनंतर या साºया हत्यांमध्ये सनातन संस्थेचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली असली तरी, त्यांचे खरे बोलविता धनी वेगळेच आहेत. आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री या प्रश्नावर काहीच बोलत नाही, असा आरोपही त्यांनी केला. सध्याचे सरकार फक्त सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असून, स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे अल्पमतातील सरकार दोन वेळेस पडले परंतु त्यांनी कधीही सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला नाही. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेत पाच किलोमीटर पायी चालणाºया नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या जीवनातील पाच स्वभाव वैशिष्ट्ये जरी अंगीकारली तरी पाच किलोमीटर चालून मिळणाºया समाधानापेक्षा सव्वाशे करोड जनतेच्या मनाचे समाधान होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.छगन भुजबळ सिद्धूच्या पाठीशीनवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीवरून निर्माण झालेल्या गदारोळावर भुजबळ यांनी भाष्य केले. कांदा, साखर जे काही असेल ते पाकिस्तानातून आयात करणारे सरकार सिद्धूच्या भेटीवरून केवढा गजहब करीत आहेत, असा सवाल केला. ‘समोर भेटला की प्रत्येकाला मार मिठी, मग समोरच्याने मारो ना मारो’ अशा शब्दात मोदी यांचे नाव न घेता भुजबळ यांनी, हे वाट वाकडे करून पाकिस्तानला गेले तर चालते मग सिद्धू गेला तर चुकले कोठे, असा सवाल केला.