शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

सनातनच्या यादीतील नावे जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:49 IST

नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. 

ठळक मुद्देजयंत पाटील : विभागीय संविधान बचाव यात्रेत मागणी

नाशिक : विचारवंतांच्या मारेकऱ्यांचे सनातनशी संबंध उघड झाले आहेत. मुख्यमंत्री या गंभीर प्रकरणाबाबत मौन बाळगून आहेत. सनातन कोणता कट आखत होते व कोणत्या मोर्चात ते बॉम्बस्फोट घडविणार होते याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी जनतेपुढे करावा, अशी मागणी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी महिला कॉँग्रेसच्या विभागीय यात्रेच्या निमित्ताने आयोजित ‘संविधान बचाव, देश बचाव’ कार्यक्रमात पाटील बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात संवैधानिक मुद्द्यांना हरताळ फासला जात असून, मनुवादी विचारांना सरकारकडूनच प्रोत्साहन दिले जात आहे. देश एकसंघ ठेवण्यासाठी ज्या घटनेचा आधार आजवर घेतला गेला, ती घटनाच जाळून टाकण्याचे पाप याच सरकारच्या काळात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे घटना जाळणाºयांवर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही की त्यांचे नागरिकत्व रद्द करण्यात आलेले नाही याचाच अर्थ मनुस्मृतीकडे पुन्हा एकवार वाटचाल करण्याच्या दृष्टीने सरकारची पावले पडू लागली आहेत. सरकारच्या विरोधात बोलणाºयांचे आवाज बंद केले जात आहेत. प्रा. कुलबुर्गी, गौरी लंकेश, कॉ. गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या त्याचेच द्योतक असून, पाच वर्षांनंतर या साºया हत्यांमध्ये सनातन संस्थेचा हात असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना अटक केली असली तरी, त्यांचे खरे बोलविता धनी वेगळेच आहेत. आठ दिवस उलटूनही मुख्यमंत्री या प्रश्नावर काहीच बोलत नाही, असा आरोपही त्यांनी केला. सध्याचे सरकार फक्त सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर करीत असून, स्व. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे अल्पमतातील सरकार दोन वेळेस पडले परंतु त्यांनी कधीही सत्ता टिकविण्यासाठी सत्तेचा गैरवापर केला नाही. त्यामुळे त्यांच्या अंत्ययात्रेत पाच किलोमीटर पायी चालणाºया नरेंद्र मोदी यांनी अटलजींच्या जीवनातील पाच स्वभाव वैशिष्ट्ये जरी अंगीकारली तरी पाच किलोमीटर चालून मिळणाºया समाधानापेक्षा सव्वाशे करोड जनतेच्या मनाचे समाधान होईल, असा टोलाही त्यांनी लगावला.छगन भुजबळ सिद्धूच्या पाठीशीनवज्योतसिंग सिद्धू यांच्या पाकिस्तान भेटीवरून निर्माण झालेल्या गदारोळावर भुजबळ यांनी भाष्य केले. कांदा, साखर जे काही असेल ते पाकिस्तानातून आयात करणारे सरकार सिद्धूच्या भेटीवरून केवढा गजहब करीत आहेत, असा सवाल केला. ‘समोर भेटला की प्रत्येकाला मार मिठी, मग समोरच्याने मारो ना मारो’ अशा शब्दात मोदी यांचे नाव न घेता भुजबळ यांनी, हे वाट वाकडे करून पाकिस्तानला गेले तर चालते मग सिद्धू गेला तर चुकले कोठे, असा सवाल केला.