शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

अण्णा भाऊंचे साहित्य त्यातील अस्सलपणामुळेच चिरंजीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:41 IST

नाशिक : ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यांचे लिखाण हे कल्पनेतील नव्हे तर वास्तवातील होते. त्याच अस्सलपणामुळे ...

नाशिक : ज्यांच्या लेखणीने आणि वाणीने संयुक्त महाराष्ट्र झाला, त्यांचे लिखाण हे कल्पनेतील नव्हे तर वास्तवातील होते. त्याच अस्सलपणामुळे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य चिरंजीव ठरते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी केले.

परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुरोगामी विचार मंच, दलित युवक आंदोलन व धम्मगिरी सामाजिक, शैक्षणिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार वितरण व परिसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर धम्मगिरी सामाजिक, शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष विशाल जाधव, दलित युवक आंदोलनाचे सचिन बागडे, पुरोगामी विचार मंचचे अशोक उफाडे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. कसबे यांनी सांगितले की, ‘अण्णा भाऊ नेहमीच सामान्य माणसांसाठी लढले, ते महान शाहीर होते. लेखणीतून त्यांनी समाजाला दिशा दाखविण्याचे काम केले. तुमचं जीवन या व्यवस्थेत बदलणार नाही, त्यामुळे ही व्यवस्था ताब्यात घ्यावी लागेल. ‘जग बदल घालूनी घाव, सांगून गेले भीमराव’ यासाठी समाजातील तरुणांना पुढे यावे लागेल’, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

यावेळी डॉ. कसबे यांच्या हस्ते सत्यशोधक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्यामध्ये सामाजिक कार्यासाठी भाऊसाहेब सोनवणे, कला व साहित्य क्षेत्रासाठी डॉ. मारोती कसाब, कामगार लढ्यासाठी कॉ. महादेव खुडे, महिला सक्षमीकरणासाठी प्रा. प्रमिला पवार, विद्यार्थी संशोधन विशाल लोमटे यांच्या वतीने त्यांच्या पालकांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ व दोन हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र सुरवसे यांनी केले.

फोटो ओळी ०७ -सत्यशोधक पुरस्कार

नाशिक : राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रा. प्रमिला पवार यांना देताना डॉ. रावसाहेब कसबे. समवेत डॉ. विशाल जाधव, सचिन बागडे, अशोक उफाडे आदी.