शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गहू पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:47 IST

पालखेड कालव्यापासून चारशे फुटावर जमीन.. मुबलक पाणी... शेतात पेरलेला गहूही चांगला... त्यामुळे यंदा खरिपात नाही तर रब्बीत का होईना घरापुरते धान्य होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निसर्गाने निराशा केली. या हतबलतेतूनच ठाणगाव येथील शेतकरी भास्कर नामदेव शेळके यांनी आपल्या उभ्या गव्हाच्या पिकात मेंढ्या तसेच इतर जनावरे सोडत संताप व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देशेतकरी हतबल : रब्बी पिकावर विविध रोगांचे आक्र मण

पाटोदा : पालखेड कालव्यापासून चारशे फुटावर जमीन.. मुबलक पाणी... शेतात पेरलेला गहूही चांगला... त्यामुळे यंदा खरिपात नाही तर रब्बीत का होईना घरापुरते धान्य होईल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांची निसर्गाने निराशा केली. या हतबलतेतूनच ठाणगाव येथील शेतकरी भास्कर नामदेव शेळके यांनी आपल्या उभ्या गव्हाच्या पिकात मेंढ्या तसेच इतर जनावरे सोडत संताप व्यक्त केला आहे.गेल्या दोन महिन्यांपासून रोजच हवामानात बदल होत असल्याने रब्बी हंगामातील पिकांवर मावा, करपा यासारख्या रोगांचे मोठ्या प्रमाणावर आक्रमण झाल्याने पिकांची वाढ खुंटली. दिवसाआड महागडी औषध व कीटकनाशकांची फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी निसर्गापुढे पुरता हतबल झाला आहे.येवला तालुक्यातील ठाणगाव येथील भास्कर शेळके यांनी आपल्या गट नंबर ५८ मध्ये अडीच एकर क्षेत्रावर दोन महिन्यांपूर्वी गव्हाची पेरणी केली. गव्हाची उगवणही चांगल्या प्रमाणात होऊन वाढही झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या हवामानातील सततच्या बदलामुळे रब्बी हंगामातील सर्वच पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली तसेच पिके पिवळी पडल्याने पिकावर विविध औषधांची फवारणी केली. आज एक औषध फवारणी केली की उद्या लगेच हवामानात बदल झाला. दुसरे औषध फवारावे लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ झाली असे असूनही रोग आटोक्यात येत नसल्याने अगदी हताश होत निर्णय घेऊन गव्हात जनावरे चरण्यासाठी सोडावी लागली.बळीराजा कर्जबाजारी; पिके उद्ध्वस्त होत असल्याने आर्थिक कोंडी आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे शेतकरीवर्ग कर्जबाजारी झाला. अशाही परिस्थितीत सावरत त्याने मोठ्या आशेने रब्बी हंगामाची शेतात पेरणी केली.यावर्षी मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकरीवर्गाने रांगडा तसेच उन्हाळ कांद्याबरोबरच गहू, हरभरा, ज्वारी, मका व भाजीपालापिकाची लागवड केली. गेल्या दोन अडीच महिन्यापासून निसर्गाच्या हटवादीपणामुळे कधी ढगाळ हवामान, तर कधी पावसाळी वातावरण. धुके, कधी मोठ्या प्रमाणात पडणारी थंडी व दवामुळे रब्बी हंगामातील पिके विविध रोगाला बळी पडले. मावा व इतर रोगांचे प्रमाण इतके आहे की त्यामुळे संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाली असल्याने उत्पादन खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.

अवकाळी पावसाने खरीप हंगामाचे वाटोळे केले. पाणी असल्याने रब्बी हंगामावर लक्ष केंद्रित करून शेतात कांदा व गव्हाची लागवड केली. मात्र सतत हवामानात बदल होत असल्याने पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने औषधांची फवारणी केली. मात्र खर्च करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने अगदी नैराशातून गहू पिकात मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्या लागल्या. कृषी विभागाने शेतकºयांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.- भास्कर शेळके, शेतकरी, ठाणगाव

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रagricultureशेती