शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

जागोजागी टोमॅटोचा खच अन् पिकांत सोडली जनावरे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:19 IST

ग्राऊंड रिपोर्ट/येवला सुयोग जोशी लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोसळलेले भाजीपाल्याचे दर, वाया गेलेला लाखो रुपयांचा खर्च अन् वातावरणाचा ...

ग्राऊंड रिपोर्ट/येवला

सुयोग जोशी

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : कोसळलेले भाजीपाल्याचे दर, वाया गेलेला लाखो रुपयांचा खर्च अन् वातावरणाचा बसलेला फटका यामुळे येवला तालुक्यातील बळीराजावर चिंतेचे सावट पसरले आहे. उत्पादित केलेल्या कोणत्याच शेतमालास दर मिळत नसल्याने उभी पिके तोडण्यात येत असून, ठाणगाव, आंबेवाडीत तर पिकांमध्ये जनावरे सोडण्यात आली आहेत. बदलत्या हवामानाने चाळीत साठवून ठेवलेला कांदाही सडून खराब होत आहे. त्यातच आता कांद्याचे दरही कोसळू लागल्याने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर पडली आहे.

टोमॅटो पिकासाठी एकरी सव्वा ते दीड लाखांपर्यंत खर्च करूनही पदरात कवडीही पडत नसल्याने संतप्त झालेल्या येवला तालुक्यातील आंबेवाडी, बाळापूर येथील शेतकरी संजय कोल्हे या शेतकऱ्याने आपल्या टोमॅटोच्या उभ्या पिकात शेळ्या व जनावरे सोडून संताप व्यक्त केला आहे. तर फकीरा बोराडे या शेतकऱ्याने मजुरांकरवी टोमॅटो पीक कापून टाकले आहे. असेच विदारक चित्र सध्या संपूर्ण तालुक्यात पहावयास मिळत आहे.

इन्फो...

कधी ओला, कधी कोरडा दुष्काळ

गेल्या काही वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीची कास धरीत नियोजनबद्ध शेती करण्यास सुरुवात केली. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ यामुळे शेतकरी वर्ग हैराण झालेला आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी वर्ग नियोजन करीत शेतात भाजीपाला व इतर पिके घेत आहे. मात्र, पिकविलेल्या पिकाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे.

कोट...

गेल्या वर्षी भाजीपाला पिकाचे चांगले उत्पादन झाले होते. यंदा मात्र तोटाच तोटा झाला. टोमॅटो पिकासाठी एकरी सव्वा ते दीड लाखापर्यंत खर्च करूनही पदरात कवडीही पडत नाही.

- संजय कोल्हे, आंबेवाडी, बाळापूर (येवला)

(फोटो मेलने पाठविले आहेत.)

येवला तालुक्यातील धुळगाव येथे चाळीत खराब झालेला कांदा फावड्याने फेकून देताना शेतकरी, तर दुसऱ्या छायाचित्रात आंबेवाडी येथे टोमॅटोच्या पिकात चरण्यासाठी सोडलेल्या बकऱ्या. (०७ पाटोदा १/२/३).