शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट’वर भुजबळ नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:01 IST

महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोकांच्या गरजा ओळखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना केल्या.

ठळक मुद्देकंपनीचा कारभार। लोकांच्या गरजा ओळखून कामे करण्याच्या आयुक्तांना सूचना

नाशिक : शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोकांच्या गरजा ओळखून कामांचे नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मनपा आयुक्तांना केल्या.पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियोजन आराखडा बैठकीत मनपा आयुक्तांनी महापालिकेचा आराखडा सादर करताना स्मार्ट सिटीच्या कामाकडे लक्ष वेधले. स्मार्ट सिटीच्या कामासंदर्भातील अनेक तक्रारी आहेत. एक किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठी दोन वर्षे लागल्याचा मुद्दा आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित करून शहरातील वाहतुकीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले. यावेळी आयुक्त गमे यांनी राष्टÑीय महामार्गाचा हा विषय असल्याचे सांगताच पालकमंत्र्यांनी वाहतूक कोंडी कमी करण्यासंदर्भात काय करता येईल याला प्राधान्य देण्याच्या सूचना केली. स्मार्ट सिटी ग्रीनफिल्ड येथील शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप निकाली निघालेले नाहीत. त्यांच्या गरजा ओळखल्या पाहिजेत. या कामातील पहिल्या टप्प्यात पूररेषेत होणाºया कामांच्या फेर नियोजनाबाबतही भुजबळ यांनी सूचना करताना लोकांच्या हितासाठी कामे व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. स्मार्ट सिटीत नागरिक असुरिक्षत असता काम नये. सुरक्षा देण्याचे काम पोलिसांचे आहे. स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये सीसीटीव्हीसाठी तरतूद केली जावी. सीसीटीव्हीमुळे शहरातील परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मदत होईल, असेदेखील पालकमंत्र्यांनी सुचविले.द्वारका चौकाच्या वाहतूक कोंडीचा मुद्दास्मार्ट शहराचा विषय मांडला जात असताना आमदार माणिकराव कोकाटे आणि आमदार राहुल अहेर यांनी द्वारका चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याची तरतूद करण्याची मागणी केली. रस्ते रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन स्मार्ट सिटीचे काम हाती घेणे अपेक्षित होते, असे कोकाटे यावेळी म्हणाले. शहरातील द्वारका आणि इंदिरानगर बोगदा येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला नाही, तर द्वारका चौकात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा कोकाटे यांनी दिला.पालकमंत्र्यांची सूचनाद्वारका येथील वाहतूक कोंडीचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाल्यानंतर भुजबळ यांनी मुंबईतील हाजीअलीचे उदाहरण दिले. वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असताना तेथील वाहतूक बेट तोडून तेथे सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. तसा काही प्रयत्न करता येईल का याचा अभ्यास करण्याच्या सूचना त्यांनी महापालिकेला दिल्या.कॅमेºयांचे नियोजन करावे-पोलीस आयुक्तशहराच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून ५२६ कॅमेरे लावण्यात आले आहे. आणखी ४,५०० सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची गरज असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले. शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी अनधिकृत रिक्षा आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण महत्त्वाचे आहे. त्यासाठीचे नियोजन करण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :Smart Cityस्मार्ट सिटी