शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

वाढत्या दराचा बाऊ केल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:17 IST

गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा लहरीपणा, वांरवार बदलणाºया हवामानामुळे तसेच शासनाच्या धोरणामुळे नेहमीच कांद्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढले आहे.

नायगाव : गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा लहरीपणा, वांरवार बदलणाºया हवामानामुळे तसेच शासनाच्या धोरणामुळे नेहमीच कांद्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढले आहे. असे असताना गेल्या अनेक वर्षांनंतर सध्या कांदा पिकास उत्पादनाच्या खर्चावर अधिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरीवर्गात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ग्राहकांना नेहमीच स्वस्तात मिळणारा कांदा थोडाफार महाग झाल्याने लगेचच शहरी ग्राहकांना ओरड करण्यास वेळ मिळाला आहे. शेतकरीवर्ग सततच्या मातीमोल भावामुळे दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला आहे. कुटुंबाची घडी बसवण्यासाठी व मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशावेळी शहरी ग्राहकांना व शासनाला बळीराजाच्या डोळ्यामधील पाणी का दिसत नाही, असा संतप्त सवाल सध्या शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. अनेक वर्षांनंतर सध्या कुठेतरी शेतकºयांना उत्पादन खर्च वजा जाता काही पैसे खिशात शिल्लक राहण्याइतका भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. सर्व संकटांचा सामना करून पिकविलेल्या कांद्यास सध्या योग्य भाव मिळत असल्याचे ग्राहकांना व शेतकºयांच्या कष्टाचे मोजमाप न कळणाºया काही लोकांनी सध्या वाढत्या कांदा भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यातील पाणी दाखवून शहरी भागातील गृहिणींचे घरखर्चाचे गणित कोलमडल्याचे दाखवले जात आहे.शेतकºयांची नेहमी बदलणारे हवामान, अतिवृष्टी, पाणीटंचाई, तर कधी शासनाच्या धोरणामुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची परिस्थिती व त्यानंतर झालेली कुटुंबाची हेळसांड आदी सर्व गोष्टींबाबतीत फारसे दाखवले जात नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेले कांद्याचे भाव यांच्या पोटात दुखू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार वाढत्या कांदा भावाचे प्रसारण दाखवून शेतकºयांच्या सुखावर विरजण टाकण्याचे काम करणाºया प्रसारमाध्यमांच्या व शहरी ग्राहकांच्या वृत्तीबाबत शेतकरीवर्गात सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.