शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
3
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
4
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
5
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
6
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
7
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
8
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
9
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
10
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
11
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
12
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
13
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
14
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू
16
"...तर दोन्ही उपमुख्यमंत्री साधे मंत्री म्हणून फिरले पाहिजेत"; ठाकरेंचं नियमावर बोट, सरकारला सुनावले खडेबोल
17
मोदींचा ‘तो’ फोटो शेअर करणाऱ्या मामा पगारेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी घेतलं खांद्यावर, केला सत्कार
18
"सत्याने प्रेरीत पण...", 'बॅड्स ऑफ..' वादावर आर्यन खाननं सोडलं मौन; समीर वानखेडे प्रकरणावर म्हणाला...
19
धंगेकरांनी पक्षांतर केले याचे त्यांना भान नाही, ते विसरले आहेत; अजितदादांनी घेतला धंगेकरांचा समाचार
20
पश्चिम बंगाल पुन्हा 'आरजी कर'सारखी घटना; MBBS च्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार...

वाढत्या दराचा बाऊ केल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:17 IST

गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा लहरीपणा, वांरवार बदलणाºया हवामानामुळे तसेच शासनाच्या धोरणामुळे नेहमीच कांद्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढले आहे.

नायगाव : गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा लहरीपणा, वांरवार बदलणाºया हवामानामुळे तसेच शासनाच्या धोरणामुळे नेहमीच कांद्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढले आहे. असे असताना गेल्या अनेक वर्षांनंतर सध्या कांदा पिकास उत्पादनाच्या खर्चावर अधिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरीवर्गात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ग्राहकांना नेहमीच स्वस्तात मिळणारा कांदा थोडाफार महाग झाल्याने लगेचच शहरी ग्राहकांना ओरड करण्यास वेळ मिळाला आहे. शेतकरीवर्ग सततच्या मातीमोल भावामुळे दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला आहे. कुटुंबाची घडी बसवण्यासाठी व मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशावेळी शहरी ग्राहकांना व शासनाला बळीराजाच्या डोळ्यामधील पाणी का दिसत नाही, असा संतप्त सवाल सध्या शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. अनेक वर्षांनंतर सध्या कुठेतरी शेतकºयांना उत्पादन खर्च वजा जाता काही पैसे खिशात शिल्लक राहण्याइतका भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. सर्व संकटांचा सामना करून पिकविलेल्या कांद्यास सध्या योग्य भाव मिळत असल्याचे ग्राहकांना व शेतकºयांच्या कष्टाचे मोजमाप न कळणाºया काही लोकांनी सध्या वाढत्या कांदा भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यातील पाणी दाखवून शहरी भागातील गृहिणींचे घरखर्चाचे गणित कोलमडल्याचे दाखवले जात आहे.शेतकºयांची नेहमी बदलणारे हवामान, अतिवृष्टी, पाणीटंचाई, तर कधी शासनाच्या धोरणामुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची परिस्थिती व त्यानंतर झालेली कुटुंबाची हेळसांड आदी सर्व गोष्टींबाबतीत फारसे दाखवले जात नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेले कांद्याचे भाव यांच्या पोटात दुखू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार वाढत्या कांदा भावाचे प्रसारण दाखवून शेतकºयांच्या सुखावर विरजण टाकण्याचे काम करणाºया प्रसारमाध्यमांच्या व शहरी ग्राहकांच्या वृत्तीबाबत शेतकरीवर्गात सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.