शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

वाढत्या दराचा बाऊ केल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:17 IST

गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा लहरीपणा, वांरवार बदलणाºया हवामानामुळे तसेच शासनाच्या धोरणामुळे नेहमीच कांद्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढले आहे.

नायगाव : गेल्या अनेक दिवसांनंतर शेतकºयांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. असे असताना लगेचच या दराचा बाऊ करण्याचे काम सुरू झाल्याने शेतकरीवर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून शेतकºयांना मातीमोल भाव मिळत होता. निसर्गाचा लहरीपणा, वांरवार बदलणाºया हवामानामुळे तसेच शासनाच्या धोरणामुळे नेहमीच कांद्याने बळीराजाच्या डोळ्यातून पाणी काढले आहे. असे असताना गेल्या अनेक वर्षांनंतर सध्या कांदा पिकास उत्पादनाच्या खर्चावर अधिक उत्पन्न मिळण्यास सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरीवर्गात सध्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ग्राहकांना नेहमीच स्वस्तात मिळणारा कांदा थोडाफार महाग झाल्याने लगेचच शहरी ग्राहकांना ओरड करण्यास वेळ मिळाला आहे. शेतकरीवर्ग सततच्या मातीमोल भावामुळे दिवसेंदिवस कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला आहे. कुटुंबाची घडी बसवण्यासाठी व मोठ्या आर्थिक संकटांना तोंड देण्यासाठी शेतकºयांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अशावेळी शहरी ग्राहकांना व शासनाला बळीराजाच्या डोळ्यामधील पाणी का दिसत नाही, असा संतप्त सवाल सध्या शेतकरी वर्गातून विचारला जात आहे. अनेक वर्षांनंतर सध्या कुठेतरी शेतकºयांना उत्पादन खर्च वजा जाता काही पैसे खिशात शिल्लक राहण्याइतका भाव मिळण्यास सुरुवात झाली आहे. सर्व संकटांचा सामना करून पिकविलेल्या कांद्यास सध्या योग्य भाव मिळत असल्याचे ग्राहकांना व शेतकºयांच्या कष्टाचे मोजमाप न कळणाºया काही लोकांनी सध्या वाढत्या कांदा भावामुळे ग्राहकांच्या डोळ्यातील पाणी दाखवून शहरी भागातील गृहिणींचे घरखर्चाचे गणित कोलमडल्याचे दाखवले जात आहे.शेतकºयांची नेहमी बदलणारे हवामान, अतिवृष्टी, पाणीटंचाई, तर कधी शासनाच्या धोरणामुळे नेहमीच आर्थिक संकटात सापडून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची परिस्थिती व त्यानंतर झालेली कुटुंबाची हेळसांड आदी सर्व गोष्टींबाबतीत फारसे दाखवले जात नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढलेले कांद्याचे भाव यांच्या पोटात दुखू लागल्याचे चित्र सध्या दिसत आहे. वारंवार वाढत्या कांदा भावाचे प्रसारण दाखवून शेतकºयांच्या सुखावर विरजण टाकण्याचे काम करणाºया प्रसारमाध्यमांच्या व शहरी ग्राहकांच्या वृत्तीबाबत शेतकरीवर्गात सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.