शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

चतुर्थश्रेणी शिक्षकेतरांच्या निर्णयाविरोधात संघटनांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

नाशिक: राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक, शिक्षकेतर संघटनांमध्ये ...

नाशिक: राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक, शिक्षकेतर संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आधीच वानवा असताना शासनाकडून कंत्राटी तत्त्वावर भरती करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक धोरण राबविले जात असल्याचा आरोप शिक्षकेतर संघटनांनी केला आहे.

अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेले शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्र पहारेकरी, सफाईगार, कामाठी हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही पदे संपुष्टात आणून त्याऐवजी ठोक स्वरूपात ही पदे भरली जावीत असा शासन निर्णय शुक्रवारी शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला. या निर्णयाविरोधात राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा अन्यायकारक निर्णय शासनाने मागे न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षक व शिक्षकेतरांच्या संघटनांनी दिला आहे.

कोट-१

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे संपुष्टात आणण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी वेळ शासनाने आणू नये, अन्यथा शासनाच्या विरोधात जनआंदोलन उभारले जाणार आहे.

-सुकदेव जाधव, जिल्हा अध्यक्ष, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना

कोट-२

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नव्या कंत्राटी भरतीमुळे शाळेची, मुला-मुलींची सुरक्षितता व कागदपत्रांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. हळूहळू अनुदानित शिक्षण क्षेत्र संपवून टाकणारे धोरण निषेधार्ह आहे. शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा अन्यायकारक धोरणाविरोधात संघटित लढा उभारण्यात येईल.

- नीलेश ठाकूर, राज्यसमन्वयक, माध्यमिक शिक्षक संघ

कोट-३

चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारा हा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशाप्रकारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करणे म्हणजे आकृतीबंधच्या नावाखाली शाळांची केलेली घोर फसवणूक आहे, शासन निर्णय मागे न घेतल्यास शाळा बंद आंदोलन करण्यात येईल.

-भाऊसाहेब बोराडे, राज्य सचिव, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना