शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
2
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
3
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
4
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
5
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
7
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
8
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
9
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
10
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
11
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
12
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
13
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
14
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
15
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
16
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
17
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
18
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
19
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
20
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!

चतुर्थश्रेणी शिक्षकेतरांच्या निर्णयाविरोधात संघटनांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:30 IST

नाशिक: राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक, शिक्षकेतर संघटनांमध्ये ...

नाशिक: राज्यातील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाविरोधात नाशिक जिल्हा शिक्षक, शिक्षकेतर संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्यातील शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आधीच वानवा असताना शासनाकडून कंत्राटी तत्त्वावर भरती करून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक धोरण राबविले जात असल्याचा आरोप शिक्षकेतर संघटनांनी केला आहे.

अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत असलेले शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्र पहारेकरी, सफाईगार, कामाठी हमाल, परिचर, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर ही पदे संपुष्टात आणून त्याऐवजी ठोक स्वरूपात ही पदे भरली जावीत असा शासन निर्णय शुक्रवारी शिक्षण विभागामार्फत घेण्यात आला. या निर्णयाविरोधात राज्यातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच हा अन्यायकारक निर्णय शासनाने मागे न घेतल्यास तीव्र स्वरुपाचे राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही शिक्षक व शिक्षकेतरांच्या संघटनांनी दिला आहे.

कोट-१

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे संपुष्टात आणण्याचा निर्णय अन्यायकारक आहे. या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल, अशी वेळ शासनाने आणू नये, अन्यथा शासनाच्या विरोधात जनआंदोलन उभारले जाणार आहे.

-सुकदेव जाधव, जिल्हा अध्यक्ष, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना

कोट-२

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नव्या कंत्राटी भरतीमुळे शाळेची, मुला-मुलींची सुरक्षितता व कागदपत्रांची गोपनीयता धोक्यात येण्याची शक्यता आहे. हळूहळू अनुदानित शिक्षण क्षेत्र संपवून टाकणारे धोरण निषेधार्ह आहे. शासनाने चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा अन्यायकारक धोरणाविरोधात संघटित लढा उभारण्यात येईल.

- नीलेश ठाकूर, राज्यसमन्वयक, माध्यमिक शिक्षक संघ

कोट-३

चतुर्थश्रेणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारा हा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, अशाप्रकारे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रद्द करणे म्हणजे आकृतीबंधच्या नावाखाली शाळांची केलेली घोर फसवणूक आहे, शासन निर्णय मागे न घेतल्यास शाळा बंद आंदोलन करण्यात येईल.

-भाऊसाहेब बोराडे, राज्य सचिव, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना