शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

अन् पहिल्याच दिवशी चुकला ‘ट्रॅक’...

By admin | Updated: June 11, 2014 00:39 IST

अन् पहिल्याच दिवशी चुकला ‘ट्रॅक’...

नरेश उमेदवारांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असला पोलीस प्रशासनाकडून सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाळणोर नाशिकपोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जात असताना, त्याचाच एक भाग असलेल्या १०० मीटर धावण्याच्या प्रकारात भरतीच्या पहिल्याच दिवशी धावण्याचा ट्रॅकच चुकल्याचा प्रकार घडला आहे. १०० मीटरऐवजी तो ८० मीटरच आखला गेल्याने पहिल्या दिवसाच्या उमेदवारांनी भरघोस गुण प्राप्त केले. त्यामुळे नंतर चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या गुणांमध्ये मोठी तफावत पडणार असून, त्याचा परिणाम गुणवत्ता यादीवर होण्याची शक्यता आहे. याबाबत काही राज्यभर पोलीस भरतीची प्रक्रिया गेल्या ६ तारखेपासून सुरू झाली आहे. या अंतर्गतच नाशिकच्या कवायत मैदानावर नाशिक शहरसाठी पोलीस भरती सुरू असून, रोज हजार ते बाराशे उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जात आहे. एका उमेदवाराला सदरची चाचणी पार करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. यात मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि जे गुणवत्ता यादीत आहेत त्यांना लेखी परीक्षेला पाचारण केले जाणार आहे. दरम्यान, भरतीच्या पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी झाल्यानंतर मैदानी चाचणीमध्ये १०० मीटर धावण्याचा प्रकार आहे. मात्र भरतीच्या पहिल्याच दिवशी सदरचा ट्रॅक चुकला. जेव्हा उमेदवारांना या ट्रॅकवरून धावण्यास सांगण्यात आले तेव्हा अपेक्षेपेक्षा अनेकांनी अत्यंत कमी वेळेत हे अंतर पार केले. सदरची बाब त्याचवेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आली नाही. मात्र उमेदवार निघून गेल्यानंतर गुणांची आकडेवारी व वेळेची नोंद पाहत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचेच धावपटू उतरल्याची शंका यावी, अशी वेळ (टायमिंग) नोंदविल्याचे निदर्शनास आले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ धावण्याचा ट्रॅक मोजला असता तो १०० ऐवजी ८० मीटर आखण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तो ट्रॅक पुन्हा १०० मीटर केला आणि दुसऱ्या दिवशी आलेल्या उमेदवारांची त्यावर चाचणी झाली. धावण्याचा ट्रॅक वाढविण्यात आल्याची बाब पहिल्या दिवशी चाचणी दिलेल्या उमेदवारांच्या लक्षात आली आणि ही चर्चा दुसऱ्या दिवसाच्या उमेदवारांच्या कानोकानी माहीत झाल्यानंतर त्यांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. तरीही काहींनी संबंधित घटनेची लेखी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तक्रारही घेण्यात आलेली नाही. सदरच्या घटनेमुळे पहिल्या दिवसाचे व नंतरच्या उमेदवारांच्या मैदानी गुणांमध्ये मोठी तफावत पडणार आहे. अर्थातच त्याचा थेट फायदा पहिल्या दिवसाच्या उमेदवारांना होणार आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे.