शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
4
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
5
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
6
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
7
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
8
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
9
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
10
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
11
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
12
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
13
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
14
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
15
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
16
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

अन् पहिल्याच दिवशी चुकला ‘ट्रॅक’...

By admin | Updated: June 11, 2014 00:39 IST

अन् पहिल्याच दिवशी चुकला ‘ट्रॅक’...

नरेश उमेदवारांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असला पोलीस प्रशासनाकडून सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. हाळणोर नाशिकपोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जात असताना, त्याचाच एक भाग असलेल्या १०० मीटर धावण्याच्या प्रकारात भरतीच्या पहिल्याच दिवशी धावण्याचा ट्रॅकच चुकल्याचा प्रकार घडला आहे. १०० मीटरऐवजी तो ८० मीटरच आखला गेल्याने पहिल्या दिवसाच्या उमेदवारांनी भरघोस गुण प्राप्त केले. त्यामुळे नंतर चाचणीसाठी आलेल्या उमेदवारांच्या गुणांमध्ये मोठी तफावत पडणार असून, त्याचा परिणाम गुणवत्ता यादीवर होण्याची शक्यता आहे. याबाबत काही राज्यभर पोलीस भरतीची प्रक्रिया गेल्या ६ तारखेपासून सुरू झाली आहे. या अंतर्गतच नाशिकच्या कवायत मैदानावर नाशिक शहरसाठी पोलीस भरती सुरू असून, रोज हजार ते बाराशे उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी घेतली जात आहे. एका उमेदवाराला सदरची चाचणी पार करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. यात मिळणाऱ्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि जे गुणवत्ता यादीत आहेत त्यांना लेखी परीक्षेला पाचारण केले जाणार आहे. दरम्यान, भरतीच्या पहिल्या दिवशी शारीरिक चाचणी झाल्यानंतर मैदानी चाचणीमध्ये १०० मीटर धावण्याचा प्रकार आहे. मात्र भरतीच्या पहिल्याच दिवशी सदरचा ट्रॅक चुकला. जेव्हा उमेदवारांना या ट्रॅकवरून धावण्यास सांगण्यात आले तेव्हा अपेक्षेपेक्षा अनेकांनी अत्यंत कमी वेळेत हे अंतर पार केले. सदरची बाब त्याचवेळी संबंधित पोलीस अधिकाऱ्याच्या लक्षात आली नाही. मात्र उमेदवार निघून गेल्यानंतर गुणांची आकडेवारी व वेळेची नोंद पाहत असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचेच धावपटू उतरल्याची शंका यावी, अशी वेळ (टायमिंग) नोंदविल्याचे निदर्शनास आले. संबंधित पोलीस अधिकाऱ्याने तत्काळ धावण्याचा ट्रॅक मोजला असता तो १०० ऐवजी ८० मीटर आखण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तो ट्रॅक पुन्हा १०० मीटर केला आणि दुसऱ्या दिवशी आलेल्या उमेदवारांची त्यावर चाचणी झाली. धावण्याचा ट्रॅक वाढविण्यात आल्याची बाब पहिल्या दिवशी चाचणी दिलेल्या उमेदवारांच्या लक्षात आली आणि ही चर्चा दुसऱ्या दिवसाच्या उमेदवारांच्या कानोकानी माहीत झाल्यानंतर त्यांनी याबाबत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांकडून त्यांच्यावर दबाव आणण्यात आला. तरीही काहींनी संबंधित घटनेची लेखी तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांची तक्रारही घेण्यात आलेली नाही. सदरच्या घटनेमुळे पहिल्या दिवसाचे व नंतरच्या उमेदवारांच्या मैदानी गुणांमध्ये मोठी तफावत पडणार आहे. अर्थातच त्याचा थेट फायदा पहिल्या दिवसाच्या उमेदवारांना होणार आहे. मात्र पोलीस प्रशासनाकडून सदर घटनेबाबत अत्यंत गुप्तता पाळली जात आहे.