शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

By admin | Updated: March 26, 2015 00:42 IST

...तर १ एप्रिलपासून एलबीटी भरणे बंद !

जालना : देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या मागण्या सारख्याच आहेत. स्वस्त धान्य दुकानदारांच्या अनेक मागण्या केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या आहेत. संघटनेच्या या मागण्या लवकरच मार्गी लागतील, असे ठोस आश्वासन केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिले. यावेळी जिल्हा संघटनेच्या एका शिष्टमंडळाने पासवान यांची भेट घेऊन त्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करुन सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलतांना पासवान म्हणाले की, देशभरातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या असलेल्या अडचणींवर केंद्र गांभीर्याने विचार करत आहेत. अन्न- धान्य गोरगरीबांपर्यत पोहचविण्यासाठी केंद्र सरकार स्वस्त धान्य दुकानदारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. संघटनेच्या असलेल्या मागण्यांपैकी अनेक मागण्या सरकारने यापूर्वीच प्रस्तावित केलेल्या आहेत. त्यात स्वस्त धान्य दुकानदारांना दहा हजार रुपये मासिक वेतन, संपूर्ण भारतात एकच कमिशन दर आणि तोही ८७ रुपये प्रतिक्विंटल, व्दारपोच धान्य पुरवठा करणार, येत्या मे महिन्यापासून बारकोड पध्दतीस सुरुवात करणार आदी बाबींवर केंद्र सरकारने गांभीर्याने विचार केलेला आहे. वरील सर्व योजना राबविण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यात अडचणी येत असल्याचेही श्री. रामविलास पासवान यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला सांगितले. या शिष्टमंडळात संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष काकासाहेब देशमुख, तसेच प्रल्हाद वाघोली, विश्वंभर बसू, चंद्रकांत यादव, प्रभाकर पाडळ, शरद कारेवार आदींसह महाराष्ट्र राज्य संघटनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. संघटनेच्या या मागण्यांना खा. शिवाजीराव अढळराव पाटील, खा. रामदास आठवले, खा. महाडिक आदींनीही पाठींबा दर्शविला.