कारखाना व्यवस्थापनाने, लोकनियुक्त संचालक मंडळाने सन २००९/२०१५/२०१६ या कार्यकाळात कारखान्यात प्रचंड गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अनियमितता, अनुत्पादक बाबीवरील प्रचंड खर्चामुळे थकीत कर्ज, ऊस उत्पादक देणी, कामगार देणी, इतर देणी यामुळे कर्जाच्या प्रचंड खाईत कारखाना सापडला आहे. थकीत कर्जाच्या वसुलीसाठी राज्य सहकारी बँकेने महाराष्ट्र सरफेसी कायदा २००२/१३(२) नुसार कारखान्याची संपूर्ण मालमत्ता, संपत्ती जप्त केली असून, कारखान्यावर शासन नियुक्त अवसायक नियुक्त केला असल्याने सभासद हक्क संपुष्टात आलेला आहे. शासन नियुक्त तत्कालीन प्राधिकृत मंडळ, राज्य सहकारी बँक यांनी कारखाना परस्पर धाराशिव साखर उद्योग उस्मानाबाद यांना प्रदीर्घ काळासाठी वार्षिक भाडेतत्त्वावर दिलेला आहे. हा प्रदीर्घ भाडेकरार अव्यवहार्य असून सभासदांचा विश्वासघात झाला असल्याने, राज्य सहकार साखर कारखाना भाडेतत्त्व उच्च अधिकार समितीसमोर कामकाज सुरू आहे. सभासद हक्क हिरावून घेतल्याने या कामकाजावर परिणाम होत आहे, सभासद हक्क पुनर्स्थापित करावा अशी मागणी असून, या प्रकरणी सुनावणी घ्यावी अशी मागणी याचिकेत देवरे यांनी केली आहे.
इन्फो...
जप्ती आदेश मागे घ्यावा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखाना परस्पर भाडेतत्त्वावर दिला असताना, बँकेने निर्धारित केलेले वार्षिक भाडे आकारणी होत असेल तर,जप्त मालमत्ता मुक्त्त होणे आवयश्यक आहे. कारखान्यावर असलेला जप्ती आदेश हटवून गेलेली प्रतिष्ठा मिळवून द्यावी अशी अपेक्षा याचिकेत आहे.
इन्फो...
अहवाल सादर करण्याचे आदेश
वसाका कारखान्यावर नियुक्त अवसायक कार्यमुक्त करण्यासह, कारखाना कामकाज व जबाबदारी निश्चित करणारी ८८ खालील चौकशी कामकाजाची प्रगती याबाबत तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेश प्रादेशिक संचालक नगर यांना साखर संचालक, प्रशासन साखर आयुक्त पुणे यांनी दिले असल्याची माहिती देवरे यांनी दिली.