शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

सुरू होण्यापूर्वीच रद्द झाली अमरावती रेल्वे गाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 00:27 IST

मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मनमाड व नाशिक स्थानकावर थांबा असलेली ही गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांत नाराजी : २५ जानेवारीपासून होते नियोजन

मनमाड : प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने येत्या २५ जानेवारीपासून अमरावती- मुंबई व पुरी- अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून यातील अमरावती- मुंबई ही विशेष गाडी सुरू होण्यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मनमाड व नाशिक स्थानकावर थांबा असलेली ही गाडी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.येत्या २५ जानेवारीपासून सुरू करण्यात येणारी गाडी क्रमांक ०२११२ अप अमरावती- मुंबई विशेष गाडी आणि गाडी क्रमांक ०२१११ डाऊन मुंबई-अमरावती विशेष गाडी ही पुढील आदेश येईपर्यंत रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. अमरावती- मुंबई गाडी दररोज अमरावतीहून १९.१० वाजता रवाना होऊन दुसऱ्या दिवशी मुंबईला ६.१५ वाजता पोहोचणार होती. भुसावळ, जळगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूरबरोबरच नाशिक रोडलाही तिला थांबा असल्याने नाशिककरांची मोठी सोय होणार होती. दरम्यान गाडी क्रमांक ०२०३७ अप पुरी- अजमेर विशेष गाडी दिनांक २१ जानेवारीपासून दर सोमवार व गुरुवारी पुरी स्टेशनहून २३.०५ वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी अजमेर स्टेशनवर १८.५५ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०२०३८ डाऊन अजमेर- पुरी विशेष गाडी दिनांक २६ जानेवारीपासून दर मंगळवार व गुरुवारी अजमेर स्टेशनहून १८.५० वाजता रवाना होईल आणि तिसऱ्या दिवशी पुरी स्टेशनला १४.२५ वाजता पोहोचेल.कोरोनाचे नियम बंधनकारककेवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविडशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेTravel Tipsट्रॅव्हल टिप्स