शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

आंबेडकर जयंती उत्सव : चलचित्रांनी वेधले लक्ष; रस्ते गर्दीने फुलले जय भीमचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 01:08 IST

नाशिक : ‘बोलो बोलो जय भीम, जय भीम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि.१४) शहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.

ठळक मुद्देसुलोचना अहिरे यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेशहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली

नाशिक : ‘बोलो बोलो जय भीम, जय भीम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि.१४) शहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सहभागी चित्ररथांच्या माध्यमातून डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा देण्यात आला. तसेच समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुलोचना अहिरे यांना समाजगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शनिवारी (दि.१४) अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर भीमगीतांनी परिसर भारावून गेला होता. सायंकाळी शहरातील विविध भीम जयंती उत्सव मंडळांसह राजकीय पक्ष व पदाधिकाºयांच्या सहभागातून मोठ्या राजवाड्यातून निघालेल्या मिरवणुकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी ‘जय भीम’चा जयघोष केला. प्रमुख रस्ते, चौकात लावलेल्या शेकडो झेंड्यांमुळे निळेमय झालेल्या वातावरणात सायंकाळी मोठ्या राजवाड्यातून महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार जयंत जाधव, देवयानी फरांदे, उपमहापौर प्रथमेश गिते, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, नगरसेवक गजानन शेलार, शोभा साबळे, संजय साबळे, महेश बिडवे, स्वाती भामरे, डॉ. हेमलता पाटील, माजी महापौर विनायक पांडे, राष्ट्रवादी शहाध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना शहरप्रमुख सचिन मराठे, रामसिंग बावरी, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त अजय देवरे, राजू भुजबळ, आनंद सोनवणे, बॉबी काळे, दिलीप साळवे, किशोर काळे, राजेंद्र गांगुर्डे, संदीप डोळस, अशोक पंजाबी, मीर मुक्तार आश्रफी आदी उपस्थित होते. प्रशासनाने जयंती उत्सव मंडळांना ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेमुक्त मिरवणूक काढण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या या आवाहनाला बहुतेक मंडळांनी प्रतिसाद दिल्याने यंदाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांसह सहभागी झालेल्या पथकांनी लक्ष वेधून घेतले. यंदाच्या मिरवणुकीत बहुतेक मंडळांनी मिरवणुकीत ढोलपथकांना प्राधान्य दिले असले तरी काही मंडळांनी डीजेच्या धडाक्यात मिरवणुकीत सहभाग घेतला. या डीजेवर तरुणाईने ठेका धरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात जल्लोष केला.