शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
3
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
4
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
5
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
6
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
7
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
8
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
9
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
10
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
11
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
12
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
13
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
14
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
15
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
16
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
17
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
18
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
19
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
20
नांदेड हादरलं! लग्नानंतरही 'प्रेयसी'ला भेटायला गेला बॉयफ्रेंड, सासरच्यांनी पकडलं; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत ढकललं

राज्यात अमर, अकबर, अ‍ॅँथनीचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:05 IST

राज्यात सध्या अमर, अकबर, अ‍ॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देरावसाहेब दानवे : साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद जुनाच

नाशिक : राज्यात सध्या अमर, अकबर, अ‍ॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमित्ताने रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी बोलताना दानवे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गत पाच वर्षांत राज्यात विविध विकासकामे सुरू केली आहेत, मात्र राज्यात नव्याने स्थापन झालेले महाविकास आघाडीचे सरकार या कामांना स्थगिती देत आहे. केंद्र सरकारने केलेला नागरिकत्व संशोधन कायद्याविषयी विरोधक नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण करून त्यांची दिशाभूल करीत आहेत.स्वातंत्र्याच्या वेळी पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये असलेली हिंदूंची संख्या आणि आजची संख्या यात मोठ्या प्रमाणात तफावत निर्माण झाली आहे. अशा नागरिकांना नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. यामुळे हा कायदा नागरिकत्व हिरवणारा नव्हे, तर नागरिकत्व देणारा कायदा आहे. भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनाही हे समजले आहे, असे सांगतानाच दानवे यांनी भाजपच्या मुस्लीम कार्यकर्त्यांनी दिलेल्या राजीनाम्यांबाबत अनभिज्ञता दर्शविली.केंद्र सरकारने काश्मीरबाबतचे ३७० कलम रद्द केल्याने देशभरात समाधानाचे वातावरण आहे. काश्मिरी जनतेच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी केंद्रातील मंत्री काश्मीरमध्ये जाणार असून, तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सरकारसमोर मांडण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.चंद्रकांत खैरे यांना दिले आव्हानकर्नाटक आणि महाराष्टÑ सीमा प्रश्नाबाबत बोलताना त्यांनी भाजप सीमावासीयांच्या बाजूने असल्याचे सांगितले. राजूर संस्थानच्या जमिनीच्या प्रश्नावर, मी कोणती जमीन बळकावली हे चंद्रकांत खैरे यांनी सिद्ध करावे, असे आव्हान दानवे यांनी दिले. खैरे यांचा पराभव झाल्यानेच ते असे आरोप करत असल्याचेही त्यांनी म्हणाले. आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफ प्रस्तावाला त्यांनी विरोध दर्शविला, तर साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद जुनाच असल्याचे सांगून हा प्रश्न राज्य सरकारने सोडवायला हवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Politicsराजकारण