शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

जिल्ह्यात कांदा उत्पादक एकाकी

By admin | Updated: August 8, 2016 22:11 IST

सव्वा महिन्यापासून लिलाव ठप्प : सरकारचे मौन, विरोधकांची बघ्याची भूमिका; शेतकरी कर्जबाजारी

सटाणा : अडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंदमुळे तब्बल सव्वा महिन्यापासून बाजार समित्या बंद असून, गोणी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना न दिल्याने अशा परिस्थिती सरकारचे मौन, विरोधकांची बघ्याची भूमिका यामुळे कांदा उत्पादकपुरता एकाकी पडल्याचे चित्र आहे. समित्या बंदमुळे साठवलेला कांदा सडू लागला असून, काहींचे वजन घटू लागले आहे. आधीच मातीमोल भाव असेला कांदा त्यात तो सडू लागल्याने तो निवडण्यासाठी लागणारी मजुरी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन निघाल्याचा दावा कृषी यंत्रणेने केला असला तरी, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे लागवडीच्या ३५ टक्के कांदापीक अक्षरश: अर्धवट सोडून द्यावे लागले आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, पंचेचाळीस अंशापर्यंत चढलेला पारा यामुळे उर्वरित कांदा साठवणक्षम आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असताना या बंदमुळे साठवलेला कांदा मोठ्याप्रमाणात सडू लागल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण, चांदवड, निफाड, सिन्नर, दिंडोरी, येवला व नाशिक हे तालुके उन्हाळ कांद्याच्या लागवडीत अव्वल स्थानावर मानली जातात. खाण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या नाशिकच्या कांद्याला देशाबरोबरच परदेशातही चांगली मागणी असते. राज्यात उन्हाळ कांदा उत्पादनात चाळीस टक्के कांदा नाशिक जिल्हा पिकवितो. यंदा कसमादे पट्ट्यासह सिन्नर, येवला, चांदवड भागात तेल्याचे दीर्घकाळ आक्रमण, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे डाळींब क्षेत्रात सुमारे साठ टक्क्यांनी घट झाली आहे. याच क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड होऊनही सलगच्या दुष्काळामुळे बहुतांश भागातील विहिरींनी जानेवारी अखेरीसच तळ गाठल्याने लागवड क्षेत्रावरील सुमारे पस्तीस टक्के कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली, तर उर्वरित क्षेत्रावरील कांदापीक जोमात असताना प्रचंड तपमान व त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या फेऱ्यात सापडल्याने ते पीक जरी निघाले असले तरी ते साठवणक्षम नसल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले. तरीदेखील कृषी विभागाने लागवड क्षेत्र गृहीत धरून यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन आल्याचा कागदोपत्री अहवाल सादर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे. (वार्ताहर)