शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

जिल्ह्यात कांदा उत्पादक एकाकी

By admin | Updated: August 8, 2016 22:11 IST

सव्वा महिन्यापासून लिलाव ठप्प : सरकारचे मौन, विरोधकांची बघ्याची भूमिका; शेतकरी कर्जबाजारी

सटाणा : अडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंदमुळे तब्बल सव्वा महिन्यापासून बाजार समित्या बंद असून, गोणी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना न दिल्याने अशा परिस्थिती सरकारचे मौन, विरोधकांची बघ्याची भूमिका यामुळे कांदा उत्पादकपुरता एकाकी पडल्याचे चित्र आहे. समित्या बंदमुळे साठवलेला कांदा सडू लागला असून, काहींचे वजन घटू लागले आहे. आधीच मातीमोल भाव असेला कांदा त्यात तो सडू लागल्याने तो निवडण्यासाठी लागणारी मजुरी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन निघाल्याचा दावा कृषी यंत्रणेने केला असला तरी, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे लागवडीच्या ३५ टक्के कांदापीक अक्षरश: अर्धवट सोडून द्यावे लागले आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, पंचेचाळीस अंशापर्यंत चढलेला पारा यामुळे उर्वरित कांदा साठवणक्षम आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असताना या बंदमुळे साठवलेला कांदा मोठ्याप्रमाणात सडू लागल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण, चांदवड, निफाड, सिन्नर, दिंडोरी, येवला व नाशिक हे तालुके उन्हाळ कांद्याच्या लागवडीत अव्वल स्थानावर मानली जातात. खाण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या नाशिकच्या कांद्याला देशाबरोबरच परदेशातही चांगली मागणी असते. राज्यात उन्हाळ कांदा उत्पादनात चाळीस टक्के कांदा नाशिक जिल्हा पिकवितो. यंदा कसमादे पट्ट्यासह सिन्नर, येवला, चांदवड भागात तेल्याचे दीर्घकाळ आक्रमण, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे डाळींब क्षेत्रात सुमारे साठ टक्क्यांनी घट झाली आहे. याच क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड होऊनही सलगच्या दुष्काळामुळे बहुतांश भागातील विहिरींनी जानेवारी अखेरीसच तळ गाठल्याने लागवड क्षेत्रावरील सुमारे पस्तीस टक्के कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली, तर उर्वरित क्षेत्रावरील कांदापीक जोमात असताना प्रचंड तपमान व त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या फेऱ्यात सापडल्याने ते पीक जरी निघाले असले तरी ते साठवणक्षम नसल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले. तरीदेखील कृषी विभागाने लागवड क्षेत्र गृहीत धरून यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन आल्याचा कागदोपत्री अहवाल सादर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे. (वार्ताहर)