शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कांदा उत्पादक एकाकी

By admin | Updated: August 8, 2016 22:11 IST

सव्वा महिन्यापासून लिलाव ठप्प : सरकारचे मौन, विरोधकांची बघ्याची भूमिका; शेतकरी कर्जबाजारी

सटाणा : अडतमुक्त धोरणाच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंदमुळे तब्बल सव्वा महिन्यापासून बाजार समित्या बंद असून, गोणी लिलावाबाबत अद्याप स्पष्टपणे निर्देश बाजार समित्यांना न दिल्याने अशा परिस्थिती सरकारचे मौन, विरोधकांची बघ्याची भूमिका यामुळे कांदा उत्पादकपुरता एकाकी पडल्याचे चित्र आहे. समित्या बंदमुळे साठवलेला कांदा सडू लागला असून, काहींचे वजन घटू लागले आहे. आधीच मातीमोल भाव असेला कांदा त्यात तो सडू लागल्याने तो निवडण्यासाठी लागणारी मजुरी अशा दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन निघाल्याचा दावा कृषी यंत्रणेने केला असला तरी, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे लागवडीच्या ३५ टक्के कांदापीक अक्षरश: अर्धवट सोडून द्यावे लागले आहे. त्यातच अवकाळी पाऊस, गारपीट, पंचेचाळीस अंशापर्यंत चढलेला पारा यामुळे उर्वरित कांदा साठवणक्षम आहे की नाही याबाबत प्रश्नचिन्ह असताना या बंदमुळे साठवलेला कांदा मोठ्याप्रमाणात सडू लागल्याने बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, देवळा, कळवण, चांदवड, निफाड, सिन्नर, दिंडोरी, येवला व नाशिक हे तालुके उन्हाळ कांद्याच्या लागवडीत अव्वल स्थानावर मानली जातात. खाण्यासाठी उत्कृष्ट असलेल्या नाशिकच्या कांद्याला देशाबरोबरच परदेशातही चांगली मागणी असते. राज्यात उन्हाळ कांदा उत्पादनात चाळीस टक्के कांदा नाशिक जिल्हा पिकवितो. यंदा कसमादे पट्ट्यासह सिन्नर, येवला, चांदवड भागात तेल्याचे दीर्घकाळ आक्रमण, अभूतपूर्व पाणीटंचाईमुळे डाळींब क्षेत्रात सुमारे साठ टक्क्यांनी घट झाली आहे. याच क्षेत्रावर कांदा पिकाची लागवड करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवर उन्हाळ कांद्याची लागवड करण्यात आली. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर लागवड होऊनही सलगच्या दुष्काळामुळे बहुतांश भागातील विहिरींनी जानेवारी अखेरीसच तळ गाठल्याने लागवड क्षेत्रावरील सुमारे पस्तीस टक्के कांदा पाण्याअभावी सोडून देण्याची वेळ आली, तर उर्वरित क्षेत्रावरील कांदापीक जोमात असताना प्रचंड तपमान व त्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या फेऱ्यात सापडल्याने ते पीक जरी निघाले असले तरी ते साठवणक्षम नसल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले. तरीदेखील कृषी विभागाने लागवड क्षेत्र गृहीत धरून यंदा कांद्याचे विक्रमी उत्पादन आल्याचा कागदोपत्री अहवाल सादर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे आजच्या घडीला दिसून येत आहे. (वार्ताहर)