शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

फास्टॅगसाठी वाहनधारकांची लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वच टोल नाक्यांवर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी होते. त्यावर उपाय म्हणून गतवर्षापासून प्रलंबित असलेल्या फास्टॅगचे ...

नाशिक : जिल्ह्यात सध्या सर्वच टोल नाक्यांवर मोठ्या संख्येने वाहनांची गर्दी होते. त्यावर उपाय म्हणून गतवर्षापासून प्रलंबित असलेल्या फास्टॅगचे बंधन आता १ जानेवारी, २०२१ पासून लागू करण्यात आले आहे. नाशिकच्या परीघात घोटी, चांदवड, पिंपळगाव, शिंदे येथे टोल भरावा लागत असल्याने, वाहनधारकांची फास्टॅगसाठी लगबग उडाली आहे.

देशातील सर्व टोल नाक्यांवर फास्टॅग आवश्यक करण्यात आले आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी आणि टोल प्लाझावर होणाऱ्या वाहतूककोंडीपासून सुटका करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्ट टॅगच्या नियमाची कठोर अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे. टोल नाक्यावर डिजिटल पद्धतीने पेमेंट होण्याच्या प्रमाणात वाढ व्हावी, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच टोल नाक्यावरील वाहतूककोंडी होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. फास्टॅग हा गाडीच्या आतील बाजूने, समोरील काचेच्या वरच्या बाजूच्या मध्यावर आरशाच्या मागील बाजूस लावायचा आहे, म्हणजे तो व्यवस्थित स्कॅन होईल. टॅगवर ज्या बाजूला फास्टॅग असे लिहिले आहे, ती बाजू चालकाकडे ठेवून, टॅग काचेवर लावायचा आहे. एकदा टॅग लावल्यानंतर तो परत काढता येत नाही, म्हणून लावण्यापूर्वी आतील काच स्वच्छ करूनच टॅग लावावा लागतो. ज्या वाहनाला फास्ट टॅग नाही, परंतु ते वाहन जर या फास्टॅग लेनमधून जात असेल, तर दुप्पट टोल भरावा लागेल, तसेच जे अजून फास्टॅग मिळवू शकले नाहीत, त्यांच्यासाठी प्रत्येक टोल नाक्यावर एक वेगळी लेन असेल, त्या लेनमधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागणार नाही. प्रवासाला निघण्यापूर्वी, फास्टॅग ज्या खात्याशी जोडलेले असेल, त्या खात्यात टोलसाठी आवश्यक तेवढे पैसे असल्याची खात्री करूनच प्रवासाला निघणे आवश्यक आहे, अन्यथा फास्टॅग लेनमधून गेल्यास, रोख दुप्पट टोल भरावा लागेल.

इन्फो

गाडी ज्याच्या नावावर त्याचेच खाते हवे

गाडी वडिलांच्या नावावर असेल, तर मुलाने किंवा दुसऱ्या कुणीही त्यांचे बँक खाते जोडून फास्टॅग काढलेला चालत नाही. ज्यांच्या नावावर गाडी आहे, त्यांनीच त्यांचे वैयक्तिक खाते फास्टॅगला जोडायचे आहे, तसेच फास्टॅग लेनमधे चेकिंग पाॅइंटवर आल्यानंतर, आपल्या पुढची स्कॅनिंग होत असलेली गाडी व आपली गाडी, या दोघांमध्ये तीन मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवायचेच आहे. कदाचित पुढच्या गाडीच्या टॅगला काही अडचण असेल, तर विनाकारण आपला टॅग स्कॅन होऊन त्या गाडीचा टोल आपल्या खात्यातून जाऊ शकतो.